शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

सातबारांवर बँक व सोसायटीचा बोझा

By admin | Updated: May 23, 2015 00:17 IST

वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत.

दरवर्षी कर्जाची उचल : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाकडे दुर्लक्षनांदेपेरा : वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. शासन स्तरावरून शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून नवनवीन पॅकेज स्वरूपात अनेक योजनांना मंजुरी देण्यात येत आहे. मात्र आत्महत्येचे सत्र संपता संपत नाही. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वणी तालुक्यात असा एकही शेतकरी नाही की, त्या शेतकऱ्याने पीक कर्जाची उचल केली नाही. मात्र पीक कर्ज मंजूर करण्याकरिता त्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांना सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती आदींमुळे कर्ज काढल्याशिवाय तरणोपाय नसतो. कर्ज काढूनच त्यांना शेती कसावी लागते. मात्र सबंधित बँक कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांना आधी सातबारावर बोझा चढवून आणा, तेव्हाच पीक कर्ज मंजूर करू, अशी भूमिका घेत आहे. एकीकडे नापिकी, दुष्काळ या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सातबारावर पीक कर्ज चढविण्याकरिता कधी तलाठ्याकडे, कधी सेतूकडे, तर कधी बँकेकडे सतत चकरा माराव्या लागत आहे. शेतकऱ्यांच्या नावे एक लाखापर्यंत कर्ज असेल, तर सातबारावर कर्जाचा बोझा चढवू नये, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. असे असतानाही राष्ट्रीयकृत बँकांनी एक लाख रूपयांच्या आत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सातबारावर ‘बोझा’ चढवून आणण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सातबारा आता रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कर्जमुक्त कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)सातबारा कर्जमुक्त होण्याची अपेक्षाशेतकऱ्यांचा सातबारा सदैव कर्जयुक्त असतो. त्यावर विविध बँकांच्या कर्जाचा बोझा चढविलेला असतो. वर्षानुवर्षे सातबारावर कर्जाचा बोझा असल्याने शेतकरी सदैव कर्जात वावरतो. त्याला कर्जफेडीची सतत चिंता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कधी कर्जमुक्त होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे एक लाखापर्यंतचे कर्ज सातबारावर बोझा म्हणून चढवू नये, असे निर्देश असतानाही बोझा चढविण्यात येत आहे. परिणामी जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा आता कर्जाच्या बोझाखाली दबून आहे. तो कधी कर्जमुक्त होणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.