शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
4
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
5
IND vs AUS : "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
6
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
7
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
8
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
9
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
10
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
11
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
12
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
13
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
14
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
15
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
16
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
17
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
18
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
19
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
20
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 

सातबारांवर बँक व सोसायटीचा बोझा

By admin | Updated: May 23, 2015 00:17 IST

वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत.

दरवर्षी कर्जाची उचल : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाकडे दुर्लक्षनांदेपेरा : वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. शासन स्तरावरून शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून नवनवीन पॅकेज स्वरूपात अनेक योजनांना मंजुरी देण्यात येत आहे. मात्र आत्महत्येचे सत्र संपता संपत नाही. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वणी तालुक्यात असा एकही शेतकरी नाही की, त्या शेतकऱ्याने पीक कर्जाची उचल केली नाही. मात्र पीक कर्ज मंजूर करण्याकरिता त्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांना सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती आदींमुळे कर्ज काढल्याशिवाय तरणोपाय नसतो. कर्ज काढूनच त्यांना शेती कसावी लागते. मात्र सबंधित बँक कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांना आधी सातबारावर बोझा चढवून आणा, तेव्हाच पीक कर्ज मंजूर करू, अशी भूमिका घेत आहे. एकीकडे नापिकी, दुष्काळ या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सातबारावर पीक कर्ज चढविण्याकरिता कधी तलाठ्याकडे, कधी सेतूकडे, तर कधी बँकेकडे सतत चकरा माराव्या लागत आहे. शेतकऱ्यांच्या नावे एक लाखापर्यंत कर्ज असेल, तर सातबारावर कर्जाचा बोझा चढवू नये, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. असे असतानाही राष्ट्रीयकृत बँकांनी एक लाख रूपयांच्या आत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सातबारावर ‘बोझा’ चढवून आणण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सातबारा आता रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कर्जमुक्त कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)सातबारा कर्जमुक्त होण्याची अपेक्षाशेतकऱ्यांचा सातबारा सदैव कर्जयुक्त असतो. त्यावर विविध बँकांच्या कर्जाचा बोझा चढविलेला असतो. वर्षानुवर्षे सातबारावर कर्जाचा बोझा असल्याने शेतकरी सदैव कर्जात वावरतो. त्याला कर्जफेडीची सतत चिंता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कधी कर्जमुक्त होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे एक लाखापर्यंतचे कर्ज सातबारावर बोझा म्हणून चढवू नये, असे निर्देश असतानाही बोझा चढविण्यात येत आहे. परिणामी जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा आता कर्जाच्या बोझाखाली दबून आहे. तो कधी कर्जमुक्त होणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.