शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

सातबारांवर बँक व सोसायटीचा बोझा

By admin | Updated: May 23, 2015 00:17 IST

वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत.

दरवर्षी कर्जाची उचल : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाकडे दुर्लक्षनांदेपेरा : वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. शासन स्तरावरून शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून नवनवीन पॅकेज स्वरूपात अनेक योजनांना मंजुरी देण्यात येत आहे. मात्र आत्महत्येचे सत्र संपता संपत नाही. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वणी तालुक्यात असा एकही शेतकरी नाही की, त्या शेतकऱ्याने पीक कर्जाची उचल केली नाही. मात्र पीक कर्ज मंजूर करण्याकरिता त्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांना सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती आदींमुळे कर्ज काढल्याशिवाय तरणोपाय नसतो. कर्ज काढूनच त्यांना शेती कसावी लागते. मात्र सबंधित बँक कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांना आधी सातबारावर बोझा चढवून आणा, तेव्हाच पीक कर्ज मंजूर करू, अशी भूमिका घेत आहे. एकीकडे नापिकी, दुष्काळ या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सातबारावर पीक कर्ज चढविण्याकरिता कधी तलाठ्याकडे, कधी सेतूकडे, तर कधी बँकेकडे सतत चकरा माराव्या लागत आहे. शेतकऱ्यांच्या नावे एक लाखापर्यंत कर्ज असेल, तर सातबारावर कर्जाचा बोझा चढवू नये, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. असे असतानाही राष्ट्रीयकृत बँकांनी एक लाख रूपयांच्या आत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सातबारावर ‘बोझा’ चढवून आणण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सातबारा आता रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कर्जमुक्त कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)सातबारा कर्जमुक्त होण्याची अपेक्षाशेतकऱ्यांचा सातबारा सदैव कर्जयुक्त असतो. त्यावर विविध बँकांच्या कर्जाचा बोझा चढविलेला असतो. वर्षानुवर्षे सातबारावर कर्जाचा बोझा असल्याने शेतकरी सदैव कर्जात वावरतो. त्याला कर्जफेडीची सतत चिंता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कधी कर्जमुक्त होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे एक लाखापर्यंतचे कर्ज सातबारावर बोझा म्हणून चढवू नये, असे निर्देश असतानाही बोझा चढविण्यात येत आहे. परिणामी जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा आता कर्जाच्या बोझाखाली दबून आहे. तो कधी कर्जमुक्त होणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.