शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बंजारा समाज बांधवांचा भाजप, शिवसेनेकडे कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 11:13 IST

बंजारा समाज बांधवांचा कल भाजप, शिवसेनेकडे वाढल्याचे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.

ठळक मुद्देविधानसभेतील आकडेवारीने स्पष्टएकही जागा न दिल्याने काँग्रेसवर अधिक रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बंजारा समाज बांधव म्हणजे एकेकाळी काँग्रेसचे कट्टर समर्थक असे मानले जात होते. परंतु हा समज आता खोटा ठरतो आहे. बंजारा समाज बांधवांचा कल भाजप, शिवसेनेकडे वाढल्याचे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.जिल्ह्यातील बंजारा बहूल विधानसभा मतदारसंघात केंद्रनिहाय झालेल्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता बंजारा समाजाच्या मतदारांनी भाजप व शिवसेनेला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. काही मतदारसंघात तांडेच्या तांडे युतीच्या उमेदवाराकडे वळल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसमध्ये महत्वाच्या पदावर असलेल्या बंजारा समाजाच्या नेत्यांच्या गावांमध्येही काँग्रेस मायनस आणि भाजप, शिवसेना प्लस असल्याचे विसंगत चित्र पुढे आले. खुद्द प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या गावातील ही स्थिती आहे.

वर्षानुवर्षे गृहित धरणे भोवलेकाँग्रेस आघाडीवर बंजारा समाजाच्या असलेल्या नाराजीचा कानोसा घेतला असता ‘गृहित धरणे’ हे प्रमुख कारण पुढे आले. वर्षानुवर्षे बंजारा समाजाला काँग्रेसकडून गृहित धरले जात आहे. राज्यात यवतमाळ, वाशिम, नांदेड, सोलापूर, लातूर, अकोला, हिंगोली, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या भागात बंजारा समाज निर्णायक आहे. बंजारा समाजाची लोकसंख्या ८० लाखांवर असल्याचे सांगितले जाते. त्या तुलनेत त्यांना लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधीत्व दिले जात नाही, अशी ओरड आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास काँग्रेसने बंजारा समाजाच्या एकाही चेहऱ्याला उमेदवारी दिली नाही. वाशिममध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघात एका महिलेला काँग्रेसने उमेदवारी दिली असली तरी ती मूळ बंजारा समाजाला दिलेली उमेदवारी ठरत नाही, असे सांगितले जात आहे. त्या तुलनेत राष्टÑवादी काँग्रेसने पुसदमध्ये इंद्रनील मनोहरराव नाईक, किनवटमध्ये प्रदीप नाईक यांंना उमेदवारी दिली. भाजपने पुसदमध्ये अ‍ॅड. नीलय नाईक तर नांदेड जिल्ह्यात तुषार राठोड आणि शिवसेनेने दिग्रसमध्ये संजय राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्या तुलनेत काँग्रेसने बंजारा समाजाला उमेदवारीपासून वंचित ठेवल्याचे दिसून येते. याच कारणावरुन बंजारा समाज दिवसेंदिवस काँग्रेसची साथ सोडून भाजप, शिवसेनेकडे वळत असल्याचे चित्र आहे.

कारंजा न दिल्याने हरिभाऊ शिवबंधनातकाँग्रेसकडे हरिभाऊ राठोड यांच्या रुपाने एकमेव आमदारकी होती, मात्र त्यांनीसुद्धा ऐन निवडणुकीच्या काळात शिवबंधन बांधले. हरिभाऊ राठोड यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली होती, मात्र ती दिली न गेल्याने नाराज होऊन त्यांनी ‘मातोश्री’ गाठले.

काँग्रेस श्रेष्ठींकडेही मांडली व्यथालोकसभा किंवा विधानसभाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्र, पक्ष संघटना, विविध शासकीय समित्या यावरही बंजारा समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व दिले जात नाही, काँग्रेसच्या मुंबई, दिल्लीतील श्रेष्ठींकडे ही व्यथा अनेकदा मांडलीही गेली. मात्र त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. त्यामुळे बंजारा समाजाने काँग्रेसपासून बहुतांश काडीमोड घेत आता भाजप, शिवसेनेशी अनेक ठिकाणी जवळीक साधल्याचे दिसून येते.

मतदारांचीच आता युतीशी हातमिळवणीमुळात काँग्रेस नेत्यांनी अनेक ठिकाणी सत्तेसाठी भाजप, शिवसेनेसोबत घरठाव केलाच आहे. यवतमाळात जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितीत हा घरठाव पॅटर्न राबविला गेला. राज्यात इतरत्रही काही उदाहरणे आहेत. ते पाहून आता जनतेनेच भाजप, शिवसेनेशी हातमिळवणी केल्याचे दिसते. नेत्यांना सोयरसूतक नाही तर समाज बांधवांनी ते का ठेवावे असा बंजारा समाजातील सूर आहे.

टॅग्स :BJPभाजपा