शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

२७ लाख नागरिकांच्या दारावर ‘आशा’ देणार दस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर सर्वेक्षण : आरोग्य विभागाची सावधगिरी, घरोघरी जाऊन मिळविणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोव्हीड-१९ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे दररोज ‘डोअर टू डोअर’ सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपासून या सर्व्हेक्षणाला गावपातळीेवर सुरूवात झाली आहे. कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.छोट्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा यांच्या मदतीने हा सर्व्हे केला जात आहे. तर मोठ्या गावामध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका मदतीला आहे. हा सर्व्हे पूर्ण करताना सर्दी, खोकला आणि ताप याची स्वतंत्र कॅटेगरी करण्याचे आदेश आहेत. तर कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीचा स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ तालुक्याला ‘रेफर’ करण्याच्या सूचना आहेत.हे सर्व्हेक्षण पार पाडणाºया वक्तीची आरोग्य विभाग विशेष काळजी घेणार आहे. त्यांना मास्क, सॅनेटायझर पुरविले जाणार आहे. गोळा झालेली माहिती दररोज अपडेट करून ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना आहे. यामुळे गावात कुठला नवीन रूग्ण आढळल्यास तत्काळ माहिती मिळणार आहे.मजुरांसाठी उघडले जाणार अन्नछत्रमजुरांच्या मदतीसाठी अन्नछत्र उघडले जाणार आहे. त्याकरिता कम्यनिटीबेस किचन गावपातळीवर उभारले जाणार आहे. स्लम भागातही याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. स्वयंसेवी संस्थांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. ज्या भागात ही मदत मिळणार नाही, अशा ठिकाणी कम्युनिटीबेस किचन उघडले जाणार आहे. एकाच ठिकाणी अशा व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील गर्दी रोखण्यासाठी एकाच वाहनातून सर्वत्र अन्न वितरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व स्वयंसेवकांना एकत्र बोलविण्यात आले आहे. यामुळे शहरातील वर्दळ कमी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहे. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यासाठी चमू तयार करण्यात आली आहे. यासोबतच विविध स्वयंसेवी संघटनांना मदतीसाठी बोलविण्यात आले. त्यांचा पत्ता आणि विविध विषयाची माहिती नोंदविण्यात आली.‘त्या’ विद्यार्थ्यांना शिधापरजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सध्या यवतमाळबाहेर जाण्यास बंदी आहे. अशा विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य घरपोच दिले जाणार आहे. त्याकरिता प्रशासनाकडे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपली नोंद करावी लागणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस