शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आठवीतील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार शिष्यवृत्तीसाठी,करा अर्ज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:48 IST

आठवीतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध : डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिकस्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी, तसेच प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिकस्तरापर्यंत होणारी गळती रोखण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी पाच ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीत शिकत असलेल्या आणि अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार, तलाठ्यांचा २०२३-२४च्या आर्थिक उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागणार आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी इयत्ता सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती, जमातीचा विद्यार्थी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. 

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व मागासवर्गीयांच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. 

परीक्षेसाठी दोन विषय बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी, असे दोन परीक्षेसाठी विषय असणार आहेत. बौद्धिक क्षमता चाचणी ही मानस- शास्त्रीय चाचणी असून, यामध्ये कार्यकार णभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राहणार आहे. यात सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, असे तीन विषय असतील. तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात. 

यांना मिळणार नाही शिष्यवृत्तीसर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते. मात्र, विनाअनुदानित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहात सवलतीचा, भोजन व्यवस्था व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी व सैनिकी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र राहणार आहेत.

टॅग्स :YavatmalयवतमाळStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती