शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा उपविभागात ८२ टक्के पेरणी

By admin | Updated: June 29, 2017 00:19 IST

पांढरकवडा कृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी तालुक्यात आत्तापर्यंत ८२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

दुबार पेरणीचे संकट : २५ टक्के बियाणे उगवलेच नाही, शेतकरी चिंतेत नरेश मानकर । लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : पांढरकवडा कृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी तालुक्यात आत्तापर्यंत ८२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु यापैकी जवळपास २५ टक्के पेरणी उलटली असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी उपविभागातील चारही तालुक्यात दोन लाख ८६९ हेक्टर जमिन लागवडी योग्य आहे. यापैकी आत्तापर्यंत एक लाख ६४ हजार ७३७ हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. पांढरकवडा उपविभागात दोन लाख ८६९ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ एक लाख ६४ हजार ७३७ हेक्टर जमिनीवर पेरणी आटोपली आहे. यापैकी एक लाख १९ हजार ७६ हेक्टर क्षेत्रात कपासी या नगदी पिकाची लागवड करण्यात आली. २४ हजार ७१० हेक्टरवर तूर, १९ हजार ४२० हेक्टरवर सोयाबीनची, तर ७४७ हेक्टर जमिनीवर ज्वारीची लागवड करण्यात आली. तालुक्यात आत्तापर्यंत ८३ टक्के पेरणी आटोपली आहे. ५३ हजार १४७ हेक्टर पैकी ४४ हजार २९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली असून सर्वाधिक ३१ हजार ४५० हेक्टर जमिनीवर कपासीची लागवड करण्यात आली आहे. चार हजार ६९० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून सात हजार ३४० हेक्टरवर तूरीची पेरणी करण्यात आली आहे. वणी तालुक्यातसुध्दा ८३ टक्के पेरणी आटोपली असून ६० हजार २९५ हेक्टरपैकी ५० हजार ११५ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. ४२ हजार ३२० हेक्टरवर कपासी, चार हजार ९०० हेक्टरवर तूर तर केवळ २५३० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मारेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ७० टक्के पेरणी पुर्ण झाली असून ४५ हजार १८९ हेक्टरपैकी ३१ हजार ७९३ हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये २२ हजार ५४० हेक्टरवर कपासी, चार हजार ८२० हेक्टरवर तूर, तर चार हजार २०० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. झरी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ९१ टके पेरणी आटोपली असून ४२ हजार २३८ हेक्टर पैकी ३८ हजार ५३६ हेक्टरवर ही पेरणी पुर्ण झाली आहे. २२ हजार ७६६ हेक्टरवर कपाशी,८ हजार हेक्टरवर सोयाबीन व ७ हजार ६५० हेक्टरवर तूरीची लागवड करण्यात आली. गेल्या तीन चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत असतांना यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे शेतकरी नव्या उमेदीने आपल्या शेतीच्या पेरणीसाठी कामाला लागला होता. मोठ्या आशेने कर्ज काढून, उधारवाडीने बी बीयाने खरेदी केले. परंतु पाहिजे तसा सार्वत्रिक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरल्या गेले. समाधानकारक पावसामुळे आटोपल्या पेरण्या यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी या चारही तालुक्यात ८२ टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. पावसाअभावी उपविभातील पेरण्या कांही प्रमाणात खोळंबल्या असल्या तरी आता पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे राहिलेली पेरणी येत्या चार दिवसात पुर्ण होईल, अशी अपेक्षा उपभिागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. यावर्षी कपासीच्या पेऱ्यात वाढ झाली असून तुरी आणि ज्वारीच्या पेरणीकडे सुध्दा शेतकरी वळले असल्याचे सातपुते म्हणाले.