शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
2
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
3
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
4
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
5
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
6
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
7
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
8
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
9
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
10
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
11
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
12
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
13
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
14
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
15
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
16
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
17
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
18
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
19
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
20
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा

पुसद तालुक्यात ३१३ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : गहू, हरभरा, संत्रा पिकांना फटका, शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्घवस्त झाली. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.तालुक्यात २८ मार्चला ०.४४ मिमी, २९ मार्च रोजी ४.६६ मिमी, तर ३० मार्चला ४.६६ मिमी पाऊस कोसळला. या तिन्ही दिवशी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वाºयाने त्यात भर घातल्याने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. यंदा तालुक्यात आठ हजार ५७६ हेक्टरवर गहू, तर नऊ हजार ८४३ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली. ज्वारी ११२ हेक्टर, मका १०६ हेक्टर, तीळ १६ हेक्टर, संत्रा २५.३५ हेक्टर, भुईमूग १७२ हेक्टर, ऊस ५३७ हेक्टर, भाजीपाला ७४१ हेक्टर, फुलशेती ६.८० हेक्टर, तर हळद ५.२५ हेक्टरवर लागवड झाली. याशिवाय १७७ हेक्टरवर चारा पिके लावण्यात आली.तीन दिवस कोसळलेल्या ७.४३ मिमी अवकाळी पाऊस व गारपिटीने १९ गावांमधील ३१३.६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये बोरी खुर्द, शेलू बु., वेणी, अश्विनपूर, मोहा, रामनगर, नंदपूर, शिवानगर, सावरगाव गोरे, नानंद (ई), नानंद खुर्द, जामनाईक क्र.१, जामनाईक क्र.२, पिंपळगाव, पारध, बान्शी, मुंगशी, वडगाव, शेलू खुर्द आदी गावांतील गहू २११ हेक्टर, हरभरा ३५ हेक्टर, संत्रा २१ हेक्टर, ज्वारी १७ हेक्टर, हळद ४ हेक्टर, फुलशेती ५ हेक्टर आदी २० हेक्टरवरील भाजीपाला पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या १९ गावांतील २९५ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तसेच रबी हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणारतालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असेही तहसीलदार प्रा. वाहूरवाघ यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी