शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

पुसद तालुक्यात ३१३ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : गहू, हरभरा, संत्रा पिकांना फटका, शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्घवस्त झाली. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.तालुक्यात २८ मार्चला ०.४४ मिमी, २९ मार्च रोजी ४.६६ मिमी, तर ३० मार्चला ४.६६ मिमी पाऊस कोसळला. या तिन्ही दिवशी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वाºयाने त्यात भर घातल्याने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. यंदा तालुक्यात आठ हजार ५७६ हेक्टरवर गहू, तर नऊ हजार ८४३ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली. ज्वारी ११२ हेक्टर, मका १०६ हेक्टर, तीळ १६ हेक्टर, संत्रा २५.३५ हेक्टर, भुईमूग १७२ हेक्टर, ऊस ५३७ हेक्टर, भाजीपाला ७४१ हेक्टर, फुलशेती ६.८० हेक्टर, तर हळद ५.२५ हेक्टरवर लागवड झाली. याशिवाय १७७ हेक्टरवर चारा पिके लावण्यात आली.तीन दिवस कोसळलेल्या ७.४३ मिमी अवकाळी पाऊस व गारपिटीने १९ गावांमधील ३१३.६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये बोरी खुर्द, शेलू बु., वेणी, अश्विनपूर, मोहा, रामनगर, नंदपूर, शिवानगर, सावरगाव गोरे, नानंद (ई), नानंद खुर्द, जामनाईक क्र.१, जामनाईक क्र.२, पिंपळगाव, पारध, बान्शी, मुंगशी, वडगाव, शेलू खुर्द आदी गावांतील गहू २११ हेक्टर, हरभरा ३५ हेक्टर, संत्रा २१ हेक्टर, ज्वारी १७ हेक्टर, हळद ४ हेक्टर, फुलशेती ५ हेक्टर आदी २० हेक्टरवरील भाजीपाला पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या १९ गावांतील २९५ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तसेच रबी हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणारतालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असेही तहसीलदार प्रा. वाहूरवाघ यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी