शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रक पेटल्याने २८ बैलांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:58 IST

जनावरांनी भरलेला ट्रक सिमेंटच्या बॅरेकेटस्ला घासत गेला. परिणामी डिझेलची टाकी फुटून ट्रकला आग लागल्याने २८ बैलांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद महामार्गावर घडली.

ठळक मुद्देमहामार्गावरील पाटणबोरीची घटनापोलिसांना हुलकावणी देताना झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलिसांना हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात जनावरांनी भरलेला ट्रक सिमेंटच्या बॅरेकेटस्ला घासत गेला. परिणामी डिझेलची टाकी फुटून ट्रकला आग लागल्याने २८ बैलांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद महामार्गावरील पाटणबोरीलगत आरटीओ चेकपोस्टवर घडली.दुर्घटनाग्रस्त ट्रकच्या मागे आणखी एक जनावरांनी भरलेला ट्रक आदिलाबादकडे जात होता. पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेऊन त्यातील ४० जनावरांची सुटका केली. त्यानंतर त्या जनावरांना गावकऱ्यांच्या मदतीने वणी तालुक्यातील रासा येथील गोरक्षणात पाठविण्यात आले.बुधवारी रात्री ११.५० वाजता एक ट्रक (क्रमांक एम.एच.२९-एच.ए.०७९१) मध्ये २८ बैल कोंबून सदर ट्रक पाटणबोरीवरून (ता. पांढरकवडा) भरधाव वेगाने आदिलाबादकडे जात होता. जाताना या ट्रकला आरटीओ चेकपोस्ट चुकवायचा होता. त्यामुळे त्याने आपल्या ताब्यातील ट्रक आरटीओच्या वे ब्रीजकडे न नेता सरळ मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. सरळ मार्गाने जाताना या रस्त्यावर सिमेंटचे बॅराकेटस् लावलेले आहेत. ट्रकचालकाने सदर बॅरेकेटस् प्लॅस्टिकचे असावे असे समजून त्यातून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅरेकेटस् सिमेंटचे असल्याने ट्रकच्या डिझेल टँकला ते घासल्या गेले. परिणामी ट्रकची डिझेल टँक फुटली. घासल्यामुळे ठिणग्यासुद्धा उडाल्या. या ठिणग्या डिझेलच्या संपर्कात आल्याने ट्रकने पेट घेतला. अवघ्या काही क्षणात आगीने संपूर्ण ट्रक आपल्या कवेत घेतला. या दुर्घटनेत ट्रक जळून खाक झाला, तर त्यातील २८ जनावरेदेखील होरपळून मृत्युमुखी पडलीत.या ठिकाणी आग विझविण्याची कोणतीच सोय नसल्याने व जनावरे ट्रकमध्ये बांधून असल्याने तेथे उपस्थित आरटीओ अधिकारी, पोलीस अधिकारी, टोल नाक्यावरील कर्मचारी हतबल झाले होते. त्यांच्या डोळ्यापुढे बैलांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मृत बैलांना पाटणबोरीलगतच्या बंद सिमेंट फॅक्टरीच्या आवारात दफन करण्यात आले.जळालेल्या ट्रकमध्ये २८ तर त्याच्या मागे असलेल्या दुसºया ट्रक (एम.पी.१९-एच.ए.०७४०) मध्ये ४० बैल बांधलेल्या अवस्थेत होते. चेकपोस्टजवळ ट्रक जळत असल्याचे पाहून मागे धावणाºया ट्रक चालकाने आपला ट्रक मागे वळविला. मात्र तोपर्यंत पाटणबोरी चौकीचे कर्मचारी तेथे पोहोचले. ट्रकला थांबविण्याचे प्रयत्न केले असता, त्यातील तिघांनी ट्रक सोडून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जळालेल्या ट्रकमध्ये चारजण होते. मात्र चौघांनी घटनास्थळावरून पलायन केले. आदिलाबाद व पांढरकवडाचे अग्नीशमन दल रात्री १ वाजताच्या सुमारास पोहोचले. जनावरांची तस्करी करणारे ट्रक नेमके कुठून आलेत, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.या मार्गाने जनावरांची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. असे असताना पोलीस व परिवहन अधिकारी यापासून अनभिज्ञ कसे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू असून गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

टॅग्स :Accidentअपघात