शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

महागावातून २५ हजार मजूर शहरात स्थलांतरित

By admin | Updated: December 27, 2014 23:00 IST

सर्वाधिक मजुरांची संख्या असलेल्या महागाव तालुक्यातून तब्बल २५ हजार मजूर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहे. तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या कामावर शुकशुकाट दिसत आहे.

महागाव : सर्वाधिक मजुरांची संख्या असलेल्या महागाव तालुक्यातून तब्बल २५ हजार मजूर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहे. तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या कामावर शुकशुकाट दिसत आहे. स्थलांतरित मजुरांना रोहयोच्या कामाकडे वळविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे. महागाव हा तालुका आदिवासी बहुल डोंगरदऱ्यात वसलेला आहे. बहुतेकांचे उपजीविकेचे साधन रोजमजुरी आहे. शेती आणि इतर कामांवर मजुरी करून चरितार्थ चालविल्या जातो. दिवाळी झाली की शेकडो मजूर ऊसतोडणीसह इतर कामांसाठी शहराकडे धाव घेतात. जवळपास २५ हजार मजूर कामाच्या शोधात बाहेरगावी गेल्याची माहिती आहे. शासनाजवळ याची अधिकृत नोंद नाही. मात्र प्रत्येक गावातून किती मजूर बाहेर गेले, याची माहिती सहज उपलब्ध होवू शकते. साधारण प्रत्येक खेड्यातून १०० ते १५० मजूर बाहेरगावी गेले आहे. यात ऊसतोडणी, विटभट्टी, बांधकाम आदी कामांवर मजूर गेले आहे. तालुक्यात रोजगार हमीची कामे मंजूर आहे. परंतु थेट मस्टरवर हजेरी असल्याने यंत्रणेकडून कमालीची हयगय केली जात आहे. कोट्यवधीची कामे मंजूर असताना मजुराअभावी ती बंद आहे. तर दुसरीकडे हाताला काम नाही म्हणून मजुरांचे स्थलांतरण होत आहे. उपलब्ध कामाचा आढावा अद्यापही लोकप्रतिनिधींनी घेतला नाही. तालुक्यात करंजखेड, दगडथर, माळवाकद येथे प्रत्येकी एक काम पाणलोटचे सुरू आहे. माळवाकद येथे वृक्षलागवड करण्यासाठी पाच मजूर आहे. दगडथर येथे वनतळ्याच्या कामावर ३३ मजूर करंजखेड येथे सिमेंटच्या दोन बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. तेथे ६६ मजूर काम करीत आहे. वन विभाग रोहयो दोन आणि एक काम तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे. सर्व मिळून १०० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मजूर शहराकडे धाव घेत आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत जनजागृती नसल्याने या कामांवर कुणी जात नाही. ग्रामपंचायत कार्यालयातील रोजगारसेवक पांढरे हत्ती झाले आहे. मजुराला नमुन्यातच अर्ज भरावा लागतो. तो कोठे मिळतो, कसा भरायचा, भरून कोठे द्यायचा, जॉब कार्ड कसे तयार करायचे आदी माहिती अशिक्षित मजुरांना मिळत नाही. त्यामुळेच तहसील आणि ग्रामपंचायत कार्यालयातून एकही अर्ज गेला नसल्याची माहिती आहे. तालुकास समन्वयक म्हणून तहसीलदार आणि सहसमन्वयक म्हणून बीडीओ हे दोघेही योजनेचे स्थानिक स्तरावर अधिकारी सक्षम असूनही मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यास कमी पडत आहे. (शहर प्रतिनिधी)