शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महागावातून २५ हजार मजूर शहरात स्थलांतरित

By admin | Updated: December 27, 2014 23:00 IST

सर्वाधिक मजुरांची संख्या असलेल्या महागाव तालुक्यातून तब्बल २५ हजार मजूर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहे. तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या कामावर शुकशुकाट दिसत आहे.

महागाव : सर्वाधिक मजुरांची संख्या असलेल्या महागाव तालुक्यातून तब्बल २५ हजार मजूर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहे. तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या कामावर शुकशुकाट दिसत आहे. स्थलांतरित मजुरांना रोहयोच्या कामाकडे वळविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे. महागाव हा तालुका आदिवासी बहुल डोंगरदऱ्यात वसलेला आहे. बहुतेकांचे उपजीविकेचे साधन रोजमजुरी आहे. शेती आणि इतर कामांवर मजुरी करून चरितार्थ चालविल्या जातो. दिवाळी झाली की शेकडो मजूर ऊसतोडणीसह इतर कामांसाठी शहराकडे धाव घेतात. जवळपास २५ हजार मजूर कामाच्या शोधात बाहेरगावी गेल्याची माहिती आहे. शासनाजवळ याची अधिकृत नोंद नाही. मात्र प्रत्येक गावातून किती मजूर बाहेर गेले, याची माहिती सहज उपलब्ध होवू शकते. साधारण प्रत्येक खेड्यातून १०० ते १५० मजूर बाहेरगावी गेले आहे. यात ऊसतोडणी, विटभट्टी, बांधकाम आदी कामांवर मजूर गेले आहे. तालुक्यात रोजगार हमीची कामे मंजूर आहे. परंतु थेट मस्टरवर हजेरी असल्याने यंत्रणेकडून कमालीची हयगय केली जात आहे. कोट्यवधीची कामे मंजूर असताना मजुराअभावी ती बंद आहे. तर दुसरीकडे हाताला काम नाही म्हणून मजुरांचे स्थलांतरण होत आहे. उपलब्ध कामाचा आढावा अद्यापही लोकप्रतिनिधींनी घेतला नाही. तालुक्यात करंजखेड, दगडथर, माळवाकद येथे प्रत्येकी एक काम पाणलोटचे सुरू आहे. माळवाकद येथे वृक्षलागवड करण्यासाठी पाच मजूर आहे. दगडथर येथे वनतळ्याच्या कामावर ३३ मजूर करंजखेड येथे सिमेंटच्या दोन बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. तेथे ६६ मजूर काम करीत आहे. वन विभाग रोहयो दोन आणि एक काम तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे. सर्व मिळून १०० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मजूर शहराकडे धाव घेत आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत जनजागृती नसल्याने या कामांवर कुणी जात नाही. ग्रामपंचायत कार्यालयातील रोजगारसेवक पांढरे हत्ती झाले आहे. मजुराला नमुन्यातच अर्ज भरावा लागतो. तो कोठे मिळतो, कसा भरायचा, भरून कोठे द्यायचा, जॉब कार्ड कसे तयार करायचे आदी माहिती अशिक्षित मजुरांना मिळत नाही. त्यामुळेच तहसील आणि ग्रामपंचायत कार्यालयातून एकही अर्ज गेला नसल्याची माहिती आहे. तालुकास समन्वयक म्हणून तहसीलदार आणि सहसमन्वयक म्हणून बीडीओ हे दोघेही योजनेचे स्थानिक स्तरावर अधिकारी सक्षम असूनही मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यास कमी पडत आहे. (शहर प्रतिनिधी)