शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आवास योजनेपासून १५० लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 5:00 AM

पंतप्रधान योजनेअंतर्गत शहरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु ज्या व्यक्तीकडे जागा नाही, असे लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या जागेवर वास्तव्यास आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागा मोजणीसाठी विलंब केला जात आहे.

ठळक मुद्देवणीतील प्रश्न : भूमिअभिलेखकडून मोजणी करण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील १५० गरिब कुटुंबातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागेची मोजणी करण्यास विलंब होत असल्याने हे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.पंतप्रधान योजनेअंतर्गत शहरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु ज्या व्यक्तीकडे जागा नाही, असे लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या जागेवर वास्तव्यास आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागा मोजणीसाठी विलंब केला जात आहे. काही महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात या लाभार्थ्यांना जागेचे पट्टे देऊ, असे सांगितले होते. मात्र त्यांना अद्यापही जागेचे पट्टे मिळाले नाही. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली असता, येथील भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मोजणीसाठी विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सर्व प्रक्रियेत घरकुल लाभार्थ्यांची मात्र कुचंबना होत असून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याबाबत ते संभ्रमात आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना