शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

राळेगावात १५ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:21 IST

तब्बल आठ कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना गतवर्षी पूर्णत्वास गेलेली असताना राळेगावकरांना आत्ताच १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पेटण्याचे संकेत असून पाण्याअभावी एप्रिल व मे महिन्यात नागरिकांवर शहर सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

ठळक मुद्देउन्हाळा पेटणार : एप्रिल, मेमध्ये शहर सोडण्याची वेळ, कायमस्वरूपी उपाययोजना दुर्लक्षित

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तब्बल आठ कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना गतवर्षी पूर्णत्वास गेलेली असताना राळेगावकरांना आत्ताच १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पेटण्याचे संकेत असून पाण्याअभावी एप्रिल व मे महिन्यात नागरिकांवर शहर सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.सात वर्षांपूर्वी ७५ लाख रुपयांचे फिल्टर प्लांट बांधून उपयोगात आले होते. दीड वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण झाले. कळमनेर येथील डोहात (वर्धा नदी पात्र) पाणीही उपलब्ध आहे. लोडशेडींगचा त्रास टाळण्यासाठी सतत वीज पुरवठा सुरु राहण्याकरिता स्वतंत्र फिडर बसविण्यात आले आहे. तरीही राळेगावला आठ-दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. गत सप्ताहात होळी, धुुळवडीच्या तोंडावर तर १५ दिवसानंतर नळ सोडण्यात आले होते. मार्चमध्येच ही स्थिती आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.वर्धा नदीचे पात्र आटले आहे. गत अनेक वर्षांपासून ही नदी सहा महिने कोरडी राहाते. गत वर्षी केवळ ६० टक्के पाऊस झाल्याने व शहराजवळचे तलाव कोरडे पडल्याने भूजल पातळी दोन मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात शहरवासीयांना पाण्यासाठी स्थलांतर करावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे ही स्थिती उद्भवली आहे. नळ कोणत्या दिवशी व वेळी येणार, याबाबात कोणतेच धोरण नाही. नळाचे दिवस निश्चित नाही. सुविधेनुसार नळ सोडले जातात. यामुळे नागरिकांना बाहेरगावी वा कामावर जाता येत नाही. उन्हाळा असूनही पाणीटंचाईमुळे कूलर लावता येत नाही. बाहेरगावावरून आलेल्या पाहुण्यांना थांबविता येत नाही. श्रीमंत, मध्यम वर्ग टँकर आणून गरज निभावून घेतात. मात्र गोरगरीब टँकर आणू शकत नाही. जादा पाणीही साठवू शकत नाही. त्यामुळे हंडाभार पाण्यासाठी त्यांची भटकंती सुरुच आहे.नगरपंचायत वीज बिलाच्या २१ लाख रुपयांचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे पथदिव्यांचा वीज पुरवठा तोडला गेला. आता पाणी पुरवठ्याची वीज कापण्याची शक्यता बळावली आहे. अशी राळेगावची गंभीर स्थिती आहे. येथे पाच असंतुष्ट भाजपा, चार काँग्रेस व एक शिवसेना नगरसेवकांचा गट सत्तेत आहे. सर्व पदाधिकारी महिला आहे. तरीही पाणीटंचाईची समस्या सुटत नाही. त्यात दिल्ली, मुंबईच्या प्रतिनिधींच्या दुर्लक्षणाने अडचणी वाढल्या आहे. एक वर्षापासून सार्वजनिक नळ, स्टँड पोस्ट बंद केल्यानेही अडचणीत भर पडली आहे. कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, अशी शहरातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे.यवतमाळला ‘अमृत’, अन्य तीन तालुक्यांना कधी?४यवतमाळ शहराला ३०० कोटी रुपये खर्च करून ‘अमृत’ योजनेंतर्गत बेंबळा धरणातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्याचवेळी दरवर्षी राळेगाव व कळंबला पाणीटंचाई भेडसावत आहे. राळेगावात नव्या वस्तीत १०-१५ दिवसांआड केवळ तासभर पाणी पुरवठा होतो. बाभूळगाव येथे तूर्तास पाणीटंचाई जाणवत नसली, तरी भविष्यातील तरतूद म्हणून या दोन्ही शहरांना अमृत प्रमाणेच बेंबळा धरणातून पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. यवतमाळसह तिन्ही ठिकाणी सतत शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, या दृष्टीनेही पावले उचलण्याची गरज आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी भावना गवळी यांनी या तिन्ही शहरात पाणी पुरवठा सुविधा करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र आता त्यांना त्या आश्वासनाचे विस्मरण झाल्याचे दिसत आहे.