Next

रानसाई आदिवासी वाडीत भूस्खलन; सहा आदिवासी पाडे अंधारात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 01:23 PM2019-08-07T13:23:24+5:302019-08-07T13:25:09+5:30

पनवेल : रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यातील रानसाई आदिवासी वाडीत भूस्खलन झाल्याने सहा वाड्याचा संपर्क तुटला आहे .या भूस्खलनामुळे ...

पनवेल : रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यातील रानसाई आदिवासी वाडीत भूस्खलन झाल्याने सहा वाड्याचा संपर्क तुटला आहे .या भूस्खलनामुळे विजेचे खांब देखील कोसळल्याने सहाही आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला आहे. या आदिवासी पाड्यामध्ये कोंड्याची वाडी , बंगल्याची वाडी , सागाची वाडी ,खैरकाठी , भूऱ्याची वाडी मार्गाची वाडी आदींचा समावेश आहे. मागील चार दिवसापासून सर्व आदिवासी वाड्या अंधारात असल्याची माहिती गोरक्षक पारधी यांनी दिली .प्रशासनाचे त्याठिकाणच्या उदभवलेल्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.