Next

Chitra Wagh यांचं Aditya Thackarey यांना खरमरीत पत्र | Chita Wagh letter to Aditya Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 02:57 PM2021-11-02T14:57:51+5:302021-11-02T14:58:25+5:30

राज्यात एकीकडे ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिकांनी विरोधी पक्ष भाजपावर गंभीर आरोप लावलेत. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने घेतलेल्या परीक्षेत सावळागोंधळ दिसून येतोय. याच गोंधळावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलंय. चित्रा वाघ यांनी पत्रात आदित्य ठाकरे यांना ४ प्रश्न विचारले आहेत. सरकारच्या भोंगळ कारभारानं विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळालंय, राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवा. कारण ते तुमच्याशिवाय कुणाचंही ऐकत नाही. त्यामुळे वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावं असं आवाहनही चित्रा वाघ यांनी केलंय. चित्रा वाघ यांनी पत्रात काय लिहिलंय पाहुयात...