२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST2021-09-12T04:46:53+5:302021-09-12T04:46:53+5:30
वाशिम : कुपोषण, रक्ताक्षय आणि जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात ...

२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?
वाशिम : कुपोषण, रक्ताक्षय आणि जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८ टक्के मुलांमध्ये जंतदोष आढळत असून, जिल्ह्यात शाळा बंद असलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच तर आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशातून जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना दरवर्षी शाळेत जंतनाशक गोळीचे वाटप केले जाते. गतवर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंदच आहेत. जे वर्ग बंद आहेत; त्या वर्गातील मुलांना अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत घरपोच आणि शाळा सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. यंदा २१ सप्टेंबर रोजी जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
००००००००००००
काय आहे जंतदोष?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. २८ टक्के बालकांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता आहे.
००००००००००००
वयाच्या १८ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
वयाच्या १८ वर्षापर्यंत आरोग्य विभागातर्फे मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते. वर्षातून दोन वेळा मोहीम राबविण्यात येते.
००००
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंद असल्याने आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच गोळ्यांचे वाटप होणार आहे. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत वाटप होईल.