शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

Video - वाशिम जिल्ह्यात महामार्गाच्या कामात प्रदुषण नियंत्रणाला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 14:17 IST

वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या अंदाजपत्रकानुसार प्रदुषण नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या अंदाजपत्रकानुसार प्रदुषण नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. गिट्टी क्रशर आणि रस्त्यावरील सपाटीकरणाच्या कामांत पाण्याचा वापर होत नसल्याने मोठ्या प्रमाणात धुळ उडून ती हवेत पसरत असल्याने पर्यावरण दुषित होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी अर्थात वायू प्रदुषणासाठी जबाबदार आहेत. या बाबी लक्षात घेऊन प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने मोठ्या प्रमाणात होणाºया बांधकाम कार्यासाठी प्रदुषण नियंत्रणाची नियमावली निश्चित करण्यात आली आहे. यात मोठमोठ्या वसाहती, इमारती आणि रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी ही नियमावली घालून देण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने चार मार्गांचे काम करण्यात येत असून, या कामांत मोठ्या प्रमाणात मुरु म, गिट्टी आदि गौण खनिजांचा वापर करण्यात येत आहे. या गौण खनिजांचा वापर करताना धुळ उडू नये म्हणून विशेष सुचना अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेल्या आहेत. यात रस्त्याच्या कामात मुरुमाचा वापर करताना पर्यावरणीय अनुमतीनुसार दबाई करताना पाण्याचा वापर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय गिट्टी फोडण्यासाठी वापरण्यात येणाºया क्रशर मशीनची स्क्रीनवर प्लास्टिक आवरण, तसेच गिट्टी क्रश करण्यासाठी वापरण्यात येणाºया दगडांची धुळ, माती काढणे आणि हे दगड फोडून गिट्टी करताना धुळ उडू नये म्हणून त्यावर पाणी टाकणे आवश्यक आहे; परंतु मंगरुळपीर-महान मार्गावर सुरू असलेल्या १६१-ए या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाशिवाय इतर कोणत्याही मार्गावर या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदुषित होऊन नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. 

 धुळीमुळे होणारे प्रदुषण घातक धुळीच्या प्रदूषणामुळे हवा, मोठया प्रमाणात बाष्प धारण करते तेव्हा गर्द धुके निर्माण होते. नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायु प्रदूषणाचा, शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. वायु प्रदूषणामुळे दीर्घ कालीन आरोग्याच्या समस्या उदभवतात. वायु प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून उडणाºया धुळीमुळे रात्री मोठ्या प्रमाणात धुके तयार होऊ वाहनधारकांना अडचणी येत आहेत.आठ हजार झाडांची कत्तलजिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी विविध मार्गांवरील ७६६३ झाडे तोडण्याचे आदेश वनविभागाने जारी केले होते. त्यातील ७० टक्क्यांवर झाडांची कत्तलही झाली. त्यातील ९० टक्के झाडे ही ५० वर्षांहून अधिक काळाची होती. आता पर्यावरण प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली झाडे आधीच तोडण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने रस्त्यांच्या कामांमुळे पर्यावरण दुषित होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. 

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी तयार अंदाजपत्रकात प्रदुषण नियंत्रणासंबंधी सुचना आहेत. यात रस्त्याच्या कामासाठी पर्यावरणीय अनुमतीनुसार पाणी टाकणे आणि गिट्टी क्रश करताना कोणत्याही प्रकारे धुळ उडू नये म्हणून उपाय आवश्यक आहेत. या नियमांचे पालन न करणाºया कंत्राटदारांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.- संजय पाटील प्रदुषण नियंत्रण अधिकारी अमरावती 

टॅग्स :washimवाशिमNational Highwayराष्ट्रीय महामार्गpollutionप्रदूषण