शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

जलवाहिनी दुरुस्तीनंतरही पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 2:59 PM

शिरपूर जैन : अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करुन संबधितांचे लक्ष वेधल्याने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. परंतु करण्यात आलेल्या थातूर-मातूर कामामुळे आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय बेलखेडनजिक वॉलच्या गळतीवरुन दिसून येते. बेलखेडजवळील वॉलमधून मोठया प्रमाणात फवारे उडून पाण्याचा पाट वाहतांना दिसून येत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. गत दहा दिवसांपाूवी पार्डी तिखे येथे लिकेज झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत असतांना याकडे कुणाचेही लक्ष नव्हते.  यासंदर्भात लोकमतने ५ जानेवारी रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच या कामास सुरुवात करण्यात आली. हे काम करतांना परिसरात अधिक कुठे लिकेज आहे का, वॉल नादुरुस्त आहेत का याची पाहणी करण्यात न आल्याने आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतांना दिसून येत आहे. एकीकडे पाणी टंचाई व दुसरीकडे होत असलेल्या या पाण्याच्या अपव्ययाबद्दल नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी रिसोड नगरपरिषदेची स्वतंत्र पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन अनेकदा लिकेज होत आहे परंतु वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी रिसोड नगरपरिषदची पाईप लाईन अनेकदा लिकीज  झाल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता. यासंदर्भात लोेकमतने वेळोवेळी पाठपुरावा करुन संबधितांचे लक्ष वेधून त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु योग्य देखरेख व नियोजनाअभावी वारंवार जलवाहिनी, वॉल लिकेज होवून पाण्याचा अपव्यय होतांना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कायमस्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड