शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने खोदल्या कुपनलिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:32 IST

पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे.

- गोपाल माचलकर पार्डी ताड: वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जलस्वराजची पाणी पुरवठा योजना बंद पडली आहेत. त्यातच  विहिरी, हातपंप हिवाळ्यातच कोरडे पडले असून, ग्रामपंचायतची कुठली पर्यायी व्यवस्था नाही. अशात पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या परिवारासह ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदल्या आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड हे  २८०० लोकसंख्येचे गाव असून, गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती किंवा शेतमजुरीच आहे. या ठिकाणी विविध धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. कधीकाळी परिसरातील नद्यांना असलेल्या पाण्यामुळे येथे पाणीटंचाई जाणवत नव्हती; परंतु नद्या, नाले बुजत गेल्याने जमिनीतील पाण्याचा निचरा कमी झाला आणि हळहळू गावातील भुजल पातळी खालावत गेली. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात येथे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. यंदा ही समस्या अधिकच तीव्र झाली. गावातील विहिरी कोरड्या पडल्या, तर हातपंप एक वर्षापासून बंद आहेत. त्यातच गावातील जलस्वराज योजनेची विहीर हिवाळ्यातच कोरडी पडली आणि पर्यायी व्यवस्था नसल्याने येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. गावकरी शेतशिवारात वणवण करीत पाणी आणू लागले. त्यामुळे शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम होऊ लागला. अशात गावातील ग्रा.पं. सदस्य धर्मराज बिडकर, माजी उपसरपंच बाळू लांभाडे, विठ्ठल गायकवाड, किशोर बाभुळे, कैलास गावंडे, दिपक ठाकरे, गजानन डाळ, रामा पानभरे, गजानन वैद्य आणि शांताराम आडोळकर यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदत स्वत:च्या परिवाराची तहान भागवितानाच गावकºयांना मोफत पाणी पुरवठा करणे सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाचा गावकºयांना मोठा आधार झाला आहे. पाणीटंचाई उपाय योजनांचे प्रस्ताव प्रलंबितचगावात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्यावतीने सरपंचांनी पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्यासह विहिर अधिग्रहीत करण्याचा प्रस्तावही पाठविला; परंतु महिना उलटला तरी, त्यातील एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या कायमच असून, आता केवळ गावातील सद्गृहस्थांचा उपक्रमच तहान भागविण्यास आधार ठरत आहे.

जलस्वराज योजनेची विहिर कोरडी पडली आहे. त्यातच गावातील इतर विहिरी आणि हातपंपांनाही पाणी नाही. त्यामुळे पंचायत समितीकडे विहिर  अधिग्रहणासह टँकरचा प्रस्ताव पाठविला आहे; परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. -विजय लांभाडे सरपंच, पार्डी ताड

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी