शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने खोदल्या कुपनलिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:32 IST

पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे.

- गोपाल माचलकर पार्डी ताड: वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जलस्वराजची पाणी पुरवठा योजना बंद पडली आहेत. त्यातच  विहिरी, हातपंप हिवाळ्यातच कोरडे पडले असून, ग्रामपंचायतची कुठली पर्यायी व्यवस्था नाही. अशात पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या परिवारासह ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदल्या आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड हे  २८०० लोकसंख्येचे गाव असून, गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती किंवा शेतमजुरीच आहे. या ठिकाणी विविध धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. कधीकाळी परिसरातील नद्यांना असलेल्या पाण्यामुळे येथे पाणीटंचाई जाणवत नव्हती; परंतु नद्या, नाले बुजत गेल्याने जमिनीतील पाण्याचा निचरा कमी झाला आणि हळहळू गावातील भुजल पातळी खालावत गेली. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात येथे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. यंदा ही समस्या अधिकच तीव्र झाली. गावातील विहिरी कोरड्या पडल्या, तर हातपंप एक वर्षापासून बंद आहेत. त्यातच गावातील जलस्वराज योजनेची विहीर हिवाळ्यातच कोरडी पडली आणि पर्यायी व्यवस्था नसल्याने येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. गावकरी शेतशिवारात वणवण करीत पाणी आणू लागले. त्यामुळे शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम होऊ लागला. अशात गावातील ग्रा.पं. सदस्य धर्मराज बिडकर, माजी उपसरपंच बाळू लांभाडे, विठ्ठल गायकवाड, किशोर बाभुळे, कैलास गावंडे, दिपक ठाकरे, गजानन डाळ, रामा पानभरे, गजानन वैद्य आणि शांताराम आडोळकर यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदत स्वत:च्या परिवाराची तहान भागवितानाच गावकºयांना मोफत पाणी पुरवठा करणे सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाचा गावकºयांना मोठा आधार झाला आहे. पाणीटंचाई उपाय योजनांचे प्रस्ताव प्रलंबितचगावात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्यावतीने सरपंचांनी पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्यासह विहिर अधिग्रहीत करण्याचा प्रस्तावही पाठविला; परंतु महिना उलटला तरी, त्यातील एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या कायमच असून, आता केवळ गावातील सद्गृहस्थांचा उपक्रमच तहान भागविण्यास आधार ठरत आहे.

जलस्वराज योजनेची विहिर कोरडी पडली आहे. त्यातच गावातील इतर विहिरी आणि हातपंपांनाही पाणी नाही. त्यामुळे पंचायत समितीकडे विहिर  अधिग्रहणासह टँकरचा प्रस्ताव पाठविला आहे; परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. -विजय लांभाडे सरपंच, पार्डी ताड

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी