शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने खोदल्या कुपनलिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:32 IST

पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे.

- गोपाल माचलकर पार्डी ताड: वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जलस्वराजची पाणी पुरवठा योजना बंद पडली आहेत. त्यातच  विहिरी, हातपंप हिवाळ्यातच कोरडे पडले असून, ग्रामपंचायतची कुठली पर्यायी व्यवस्था नाही. अशात पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या परिवारासह ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदल्या आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड हे  २८०० लोकसंख्येचे गाव असून, गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती किंवा शेतमजुरीच आहे. या ठिकाणी विविध धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. कधीकाळी परिसरातील नद्यांना असलेल्या पाण्यामुळे येथे पाणीटंचाई जाणवत नव्हती; परंतु नद्या, नाले बुजत गेल्याने जमिनीतील पाण्याचा निचरा कमी झाला आणि हळहळू गावातील भुजल पातळी खालावत गेली. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात येथे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. यंदा ही समस्या अधिकच तीव्र झाली. गावातील विहिरी कोरड्या पडल्या, तर हातपंप एक वर्षापासून बंद आहेत. त्यातच गावातील जलस्वराज योजनेची विहीर हिवाळ्यातच कोरडी पडली आणि पर्यायी व्यवस्था नसल्याने येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. गावकरी शेतशिवारात वणवण करीत पाणी आणू लागले. त्यामुळे शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम होऊ लागला. अशात गावातील ग्रा.पं. सदस्य धर्मराज बिडकर, माजी उपसरपंच बाळू लांभाडे, विठ्ठल गायकवाड, किशोर बाभुळे, कैलास गावंडे, दिपक ठाकरे, गजानन डाळ, रामा पानभरे, गजानन वैद्य आणि शांताराम आडोळकर यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदत स्वत:च्या परिवाराची तहान भागवितानाच गावकºयांना मोफत पाणी पुरवठा करणे सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाचा गावकºयांना मोठा आधार झाला आहे. पाणीटंचाई उपाय योजनांचे प्रस्ताव प्रलंबितचगावात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्यावतीने सरपंचांनी पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्यासह विहिर अधिग्रहीत करण्याचा प्रस्तावही पाठविला; परंतु महिना उलटला तरी, त्यातील एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या कायमच असून, आता केवळ गावातील सद्गृहस्थांचा उपक्रमच तहान भागविण्यास आधार ठरत आहे.

जलस्वराज योजनेची विहिर कोरडी पडली आहे. त्यातच गावातील इतर विहिरी आणि हातपंपांनाही पाणी नाही. त्यामुळे पंचायत समितीकडे विहिर  अधिग्रहणासह टँकरचा प्रस्ताव पाठविला आहे; परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. -विजय लांभाडे सरपंच, पार्डी ताड

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी