पाणीपुरवठा योजना १८ वषार्पासून बंद  

By Admin | Updated: April 24, 2017 14:11 IST2017-04-24T14:11:41+5:302017-04-24T14:11:41+5:30

पाणीपुरवठा योजना मागील १८ वषार्पासून बंद असल्याने सर्वसुविधा असतांना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत.

Water supply scheme has been closed for 18 years | पाणीपुरवठा योजना १८ वषार्पासून बंद  

पाणीपुरवठा योजना १८ वषार्पासून बंद  

मालेगाव -  तालुक्यातील केळी गावात ७ विहिरी , ४ कुपनलीका असूनही गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . गावाची  पाणीपुरवठा योजना मागील १८ वषार्पासून बंद असल्याने सर्वसुविधा असतांना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत.
      केळी ८०० लोकवस्तीच गाव . गावातील असलेल्या हातपंप व विहिरींना पाणी नाही .त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . गावाजवळ मालेगाव लघु पाटबंधारे योजनेचा तलाव आहे . अवैध पानीउपस्सामुळे हा तलाव कोरडा झाला आहे .त्यामुळे गावातील भूजल पातळीत घट झाली आहे .  सद्या ग्रामस्थ दीड किलोमीटर अंतरावरुन पाणी आणतात . गावाला टंकर ने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे . मालेगाव लघु पाटबंधारे योजनेच्या प्रकल्पाच्या अप्पर स्ट्रिमला विहीर खोदुन पाणीपुरवठा योजना सुरू केली होती .ती १८ वर्षापासून बंद आहे . गावात नविन विहीर खोदल्यास पाणी लागते त्यामूळे नविन विहीर खोदावी असा प्रस्ताव ग्राम पंचायत ने पंचायत समितीला दिला आहे

Web Title: Water supply scheme has been closed for 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.