शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; उपाययोजनांची व्याप्तीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 5:16 PM

वाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. येथे पिण्याच्या पाण्याचा अपवाद वगळता वापरण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असून, अन्य काही गावातही पाण्यासाठी नागरिकांची पायपिट सुरूच आहे.गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, आता पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आहे. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मानोरा तालुक्यात गलमगाव, पाळोदी, रिसोड तालुक्यात भर जहॉगीर परिसर, मालेगाव तालुक्यातील बोराळा, राजूरा यासह डोंगराळ भागातील नागरिक, वाशिम तालुक्यातील माळेगाव, भोयता परिसर, कारंजा तालुक्यातील गिर्डा, बांबर्डा परिसर आदी भागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नागरिकांची मागणी आणि पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजनांची व्याप्ती वाढविल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत ४५ गावांत टँकर मंजूर असून, १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ४५ टँकरमध्ये वाशिम तालुक्यातील १६ गावे, मालेगाव तालुक्यात सात, रिसोड चार, मंगरूळपीर नऊ, मानोरा पाच आणि कारंजा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याप्रमाणेच २५३ विहिर अधिग्रहणामध्ये वाशिम तालुक्यात ५९, मालेगाव ३१, रिसोड ५०, मंगरूळपीर ५४, मानोरा १८ आणि कारंजा तालुक्यात ३१ अशा ठिकाणचा समावेश आहे. या टंचाईग्रस्त गावांत टँकर किंवा विहिर अधिग्रहणामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी वापरण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या टंचाईग्रस्त गावांव्यतिरिक्त रिसोड तालु्क्यातील भर जहॉगीर परिसरातील पाच गावे, लोणी परिसरात तीन गावे, कारंजा तालुक्यातील हिवरा, गंगापूर, आखतवाडा, मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील तीन गावे आदी गावांमध्येही पाण्यासाठी नागरिकांना दूरवर पायपिट करावी लागत आहे. गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असले्ल्या शेतातील विहिरींवरून भर उन्हात पाणी आणण्याची कसरत महिलांना करावी लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई