शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

  मंगरुळपीर येथे पाणीटंचाई तीव्र; तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:56 PM

मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही.

ठळक मुद्देसोनल प्रकल्पातील मृतसाठा मोतसावंगा प्रकल्पात वळविण्यासाठी  ४ कोटी १ लाख ८० हजाराचा रुपये खर्चाच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेची उपयुक्तता आणि इतर तांत्रिकबाबी पडताळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने सर्वेक्षणही करण्यात आले.ता या योजनेला अद्याप अंतिम मंजुरीच मिळालेली नसून, मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

मंगरुळपीर: शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर नियंत्रणासाठी मंगरुळपीर पालिकेच्या प्रस्तावानुसार मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या योजनेला कार्यान्वित होण्यास बराच विलंब लागणार असून, नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

मंगरुळपीर शहरातील पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी तातडीची व तात्पुरती उपाययोजना करण्यासाठी सोनल प्रकल्पातील मृतसाठा मोतसावंगा प्रकल्पात वळविण्यासाठी  ४ कोटी १ लाख ८० हजाराचा रुपये खर्चाच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेची उपयुक्तता आणि इतर तांत्रिकबाबी पडताळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने सर्वेक्षणही करण्यात आले असून, या संदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हा प्रशासनाने अहवाल मागितला आहे. त्या अहवालाची पाहणी करण्यात आल्यानंतरच या योजनेला मंजुरी मिळणार आहे. या योजनेचे काम पालिकेच्यावतीने कंत्राटदारामार्फत केले जाणार असल्याची माहिती आहे. आता या योजनेला अद्याप अंतिम मंजुरीच मिळालेली नसून, मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या योजनेंतर्गत सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत १२६०० मीटर अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यामुळे कामाला मोठा कालावधी लागणार असून, अद्याप अंतिम मंजुरीच मिळाली नसल्याने हे काम कधी पूर्ण होईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच सोनल प्रकल्पातील सध्याची मृतसाठ्याची स्थिती पाहतायोजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा किती फायदा मंगरुळपीर शहराला होईल, याबाबत शंकाच आहे.  

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरwashimवाशिमWaterपाणी