शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मालेगावात भीषण पाणीटंचाई; अद्याप टँकरचा पत्ता नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 18:16 IST

 मालेगाव :  शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून काटेपूर्णा ते कुरळा पाइपलाइनचे काम आता सुरु झाले आहे. तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तथापि, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने शहरवासियांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देतब्बल एक महिन्यापासून मालेगाव शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मालेगाव शहरात पाण्याचे दुसरे कोणतेही स्तोत्र उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याची सर्व भिस्त आता विकत मिळणाºया टँकरच्या पाण्यावर आहे.

 मालेगाव :  शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून काटेपूर्णा ते कुरळा पाइपलाइनचे काम आता सुरु झाले आहे. तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तथापि, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने शहरवासियांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 

तब्बल एक महिन्यापासून मालेगाव शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आता पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. मालेगाव शहरातील नळ योजना पाण्याअभावी बंद आहे. मालेगाव शहरात पाण्याचे दुसरे कोणतेही स्तोत्र उपलब्ध नाही त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याची सर्व भिस्त आता विकत मिळणाºया टँकरच्या पाण्यावर आहे. शहरात तीस हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. त्यातील पाच ते दहा टक्के लोकांजवळ बोअरचे पाणी उपलब्ध आहे. उर्वरीत नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. कारण पाणी विकत घेतल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. अशा स्थितीत खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घेणाºया टँकरच्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. लहान मोठे टँकर हे पाणी विकण्यासाठी दिवस-रात्र रस्त्यावरून धावत असल्याचे दिसून येते. एक हजार लिटर पाण्यासाठी २५० रुपये तर पाच हजार लिटरच्या टँकरसाठी ८०० ते एक हजार रुपये मोजावे लागत आहेत.  यापुढे शहरातील पाणी समस्या अधिक भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी काही दिवसात पाणीपुरवठा करणाºया टँकरच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज आहे.  त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शहरात तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी काही जणांनी उपोषण आंदोलन केले होते. यावेळी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिक वाढली आहे.

शहरात बांधकामे जोरात !

मालेगाव नगर पंचायतच्या हद्दित जवळपास २० बांधकाम जोरात सुरु आहेत. यावर नगर पंचायतचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. ही बांधकामे बंद केली तर पाण्याची बचत होऊ शकते. ही बांधकामे त्वरित बंद करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवWaterपाणी