शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ?

By admin | Updated: November 17, 2014 00:00 IST

उपाय योजनांसाठी प्रशासनाला सूचना: अधिकारी आश्‍वस्त.

कारंजा लाड (वाशिम): यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे कारंजा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होऊ शकला नसून, तालुक्यातील इतर जलाशयांतही ३५ टक्क्यांच्या आसपासच जलसाठा असल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवन्याची शक्यता आहे. कारंजा तालुक्यात १६७ गावे आहेत. तालुक्यातील उजाड गावे वगळता १३१ गावे आहेत. त्यापैकी किमान १८ गावांत यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ही समस्या लक्षात घेऊन सबंध शासकीय यंत्रणा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करीत आहे. यासाठी गावातील विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकरची व्यवस्था करण आवश्यक आहे. पाणीटंचाईचे संभाव्य संकट विचारात घेऊन नवनिर्वाचित आमदार राजेंद्र पाटणी यांनी १५ नोव्हेंबर रोजी कारंजा पंचायत समितीमध्ये सर्व संबंधित अधिकार्‍यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी योजना तयार केली. या वर्षी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम हातातून गेला व रब्बी हंगामात पाण्याचा बेसुमार उपसा झाला, तर तालुक्यावर जलसंकट ओढवणार आहे. आमदार पाटणी यांनी पाणीटंचाईबाबत संबंध तालुक्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या आहेत. कारंजा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या त्या संदर्भातील योजनांवर पाणीटंचाई सभेत चर्चा करण्यात आली. पाणीटंचाईचा सामना सर्व सुविधांसह कसा करता येईल. या संबंधीही सभेत चर्चा झाली. वाशिम जिल्हय़ातील अडाण प्रकल्पाचे व्यवस्थापन जीवन प्राधीकरणाच्या यवतमाळ विभागाकडून करण्यात येते आणि या विभागाच्या क ारंजा शाखेनुसार अडाण प्रकल्पात शहराला पुरेल एवढय़ा प्रमाणात पाणीसाठा आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असताना विज रोहित्र वेळेवर मिळत नसल्याचे मत व्यक्त करून ही सडलेली यंत्रणा सुधारण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे मतही पाटणी यांनी यावेळी व्यक्त केले होते. एकंदरीत स्थिती पाहता क ारंजा तालुक्यात जलसाठा पुरेसा नसला तर, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन पूणपणे ाज्ज असल्याचे दिसत आहे. मजीप्रा कारंजा विभागाचे शाखाधिकारी प्रसाद नुलकर यांनी लोकमत प्र ितनिधीशी बोलताना कारंजा शहरास पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात सद्यस्थितीत पुरेसा जलसाठा असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी ३५ टक्केच जलसाठा असल्याचे स्पष्ट करून प्रशासन पाणीटंचाईची परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले. आवश्यकता असल्यास विहीर अधिग्रहण व टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.