शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

टंचाईच्या काळात आडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 8:42 PM

आडोळ लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे परिसरात पाणीटंचाई देखील जाणवत आहे. असे असताना पार्डीतिखे गावानजिक धरणातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्देपाईपलाईन लिकेजशेतक-यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा (वाशिम): येथील आडोळ लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे परिसरात पाणीटंचाई देखील जाणवत आहे. असे असताना पार्डीतिखे गावानजिक धरणातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने कानाडोळा केल्याने शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.यावर्षी उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे आडोळ लघुप्रकल्पात शिल्लक असलेले संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले असून प्रकल्पासाठी जमिनी देणा-या शेतक-यांना पिकांसाठी पाणी देणे बंद करण्यात आले आहे. शेतक-यांनी जिल्हाधिका-यांमार्फत प्रकल्पातील पाणी मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केले; परंतु रिसोड, शिरपूर, रिठद या गावांकरिता पाणी राखीव ठेवावे लागत असल्याने सिंचनासाठी यंदा पाणी मिळणार नाही, अशी भुमिका प्रशासनाने घेतली आहे. दुसरीकडे पार्डीतिखे गावाजवळ आडोळ प्रकल्पातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा राजरोसपणे अपव्यय होत आहे. याशिवाय इतरही ८ ते १० ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे विशेषत: शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिका-यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा, अशी मागणी जोर धरत आहे. .

पाईपलाईन लिकेज असल्याने होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाबद्दल रिसोड नगर परिषदेच्या अभियंत्यांना अनेकवेळा कळविण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून याप्रकरणी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ रखडला आहे.- बबनराव मिटकरी, शेतकरी, बोराळा जहाँ.

टॅग्स :Waterपाणी