शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; केवळ सात गावांमध्ये टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:46 AM

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे २६ विहिरींचे अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सरासरी ३० टक्के घट झाली. जिल्ह्यातील पैनगंगेवरील बॅरेजेसचा अपवाद वगळता इतर मध्यम व लघू असा एकही प्रकल्प या पावसामुळे तुडुंब भरलेला नव्हता. याशिवाय विहिरी, हातपंप, कूपनलिकांची पाणी पातळीही समाधानकारक वाढली नाही. त्यामुळे चालू वर्षी लवकरच पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्येच ५१० गावांचा संभाव्य कृती आराखडा तयार करून ५७८ उपाययोजना आखल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र मार्च महिन्यात होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्चअखेर जिल्ह्यातील बाभूळगाव, काकडदाती (ता. वाशिम), उज्वलनगर, जनुना खुर्द, गलमगाव (ता. मानोरा) आणि गिर्डा, धोत्रा देशमुख (ता. कारंजा) या सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय २६ गावांमधील विहिरी आणि कुपनलिका अधिग्रहित करून त्याद्वारे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली, त्या गावांनी जिल्हा प्रशासनाकडे टँकर मागणी प्रस्ताव सादर करावे. पाणी उपलब्धता आणि विहीर अधिग्रहण प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून संबंधित गावांना विनाविलंब पाणीपुरवठा केला जाईल. प्रशासनाकडूनही अशा पाणीटंचाईग्रस्त गावांची चाचपणी सध्या केली जात आहे. - शैलेष हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम