शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खासदार भावना गवळी यांनी दत्तक घेतलेल्या सायखेड्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 3:08 PM

सांसद आदर्श ग्राम सायखेडा येथे गत तीन वर्षापूवी पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप या योजनेचे कामच सुरु असल्याने गावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा   : सांसद आदर्श ग्राम सायखेडा येथे गत तीन वर्षापूवी पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप या योजनेचे कामच सुरु असल्याने गावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. गावकºयांना शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. मोलमजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ सायखेडावासियांवर येवून ठेपली आहे.  पाणि पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत असून गावकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.खासदार  भावनाताई गवळी यांनी मंगरुळपीर तालूक्यातील सायखेडा हे गाव दत्तक घेतले आहे. तीन वर्षापूूर्वी ग्राम विकासाचा पाया रचल्या गेला आणि गावात पाणि टंचाई संकट या विषयाला गावकºयांनी संमती दिली व खासदार यांनी ६३ लाखाची पाईप लाईन, विहीर खोलीकरण, रुंदीकरण,जलकुंभासह मजूंर केले. या सर्व कामाचे उदघाटन  ५ जानेवारी २०१७ रोजी मोठ्या थाटात उदघाटनही झाले.त्यावेळी  गावकरी आनंदीत झाले परंतु तीव वर्ष पुर्ण होऊनही काम कासव गतीने सुरुच आहे. त्यामुळे ग्रामस्थाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातिल महीला व शालेय विद्यार्थी घोटभर पाण्यासाठी वनवन भटकत आहेत . एवढेच नव्हेतर रस्ते,नाल्या, भुमीगत गटार विवीध कामे मंजूरात असतांही केवळ पाईप लाईनच्या खोदकामाने मंजूर कामे प्रलंबीत आहेत.आणि संबधित कंत्राटदाराने अनेक दिवसापासून ठिकठीकानी रस्ते खोदून ठेवल्याने गावकरी ञस्त झाले आहेत . तरी संबधितांनी याकडे लक्ष देवून येथील पाण्याची टंचाई दूर करण्याची मागणी  सायखेडा ग्रामस्थांच्यावतिने होत आहे.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीwater scarcityपाणी टंचाई