शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 4:02 PM

नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

केनवड/काजळेश्वर : रिसोड तालुक्यातील केनवड आणि कारंजा तालुक्यातील काजळे्श्वर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.केनवड : मेहकर ते मालेगाव मार्गावर वसलेल्या केनवड येथे ग्रामपंचायतच्या नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. योग्य नियोजन नसल्यामुळे कधी १० व्या दिवशी तर कधी १७ व्या दिवशी नळ येतात. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना एक ते दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तीन, चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल, एवढा जलसाठा विहिरीमध्ये आहे. परंतू, नियोजन नसल्यामुळे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गावकºयांना शेतातील विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे. लहान मुलांसह महिला व आबालवृद्धांनादेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.काजळेश्वर उपाध्ये : येथील विहीरीत पाणीसाठा असूनही गावकºयांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. वीज भारनियमनामुळे जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. याचा फटका गावकºयांना बसत आहे. महावितरणने विद्युत खांबावर तारजोडणी केली नाही. त्यामुळे पाण्यासाठी गावकºयांना वैताग झाला आहे. कुपनलिकेचा आधार घेत गावकरी, महिला पुरुष मे महिन्याच्या उकाडयात सकाळ, दुपार, रात्री या वेळेत गर्दी नसेल तेव्हा पाणी भरत असल्याचे दिसून येते. तर गुरांकरीता पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था महेंद्रा पाटील उपाध्ये आणि दिलीप पा. उपाध्ये या बंधूंनी त्यांच्या हौदावर केली आहे. मे महिन्यात पाण्यासाठी गावकºयांची गैरसोय होत असल्याने याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव टेलर जाधव यांनी १७ मे रोजी केली.

 काजळेश्वरला पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर स्वतंत्र रोहित्र मंजूर आहे. मात्र विद्युत खांबावर लॉकडाउनमुळे तार जोडणी बाकी आहे. येत्या तीन दिवसात महावितरणाकडून तार मिळेल व तारजोडणी झाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा केला जाईल. नितीन पा. उपाध्येसदस्य ग्रामपंचायत काजळेश्वर.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई