शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

वाशिम जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:23 PM

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

ठळक मुद्दे१३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक.शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. 

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली असून ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. दरम्यान, या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली असून त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२८ लघु अशा १३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक राहिलेला असून तब्बल ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. १० ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या १९ प्रकल्पांचा समावेश असून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठ्यासंदर्भात उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी