शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

पुराचे पाणी घुसले शेतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:47 PM

वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह परिसरातील शेकडो हेक्टर शेतांत हे पाणी घुसले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त प्रकाशित करून या संदर्भात महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधले होते, हे विशेष.शेलुबाजार : शुक्रवारी दुपारनंतर शेलुबाजार परिसरातील गोगरी, हिरंगी, लाठी, चिखली, कंझरा, पिंप्री अवगण या गावात धो-धो पाऊस कोसळल्याने नदीनाल्याना पुर आला. यामुळे पेरणी केलेली बियाणे वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ३२ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.मंगरुळपीर ते शेलूबाजार दरम्यान राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाच्यावतीने रस्त्याचे काम सुरु आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेलूबाजार व खंड्या नाल्याच्या पुलाचे काम सुरु करण्यात आले. पुलाचे काम करताना वाहतुकीसाठी योग्यरित्या पर्यायी रस्ता तयार केला नाही तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे कामही केले नाही. शुक्रवारी पहिल्याच पावसामुळे पूर आल्याने सायंकाळी ४ वाजेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मंगरुळपीर-शेलुबाजार मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे पहिल्याच पावसात वाहनधारकांसह शेतकºयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अडान नदीच्या ठिकाणी पर्यायी रस्ता तयार करताना पाईप टाकणे गरजेचे होते. परंतु पाईप टाकण्यात आले नाहीत. अडान नदी व खंड्या नाल्याला आलेल्या पुरामुळे निर्माणाधिन पुलाला धक्का बसण्याची भीती वर्तविली जात आहे. पुरामुळे अडाण नदीवरील पुलाखाली उभारण्याच्या आलेल्या ‘सेंट्रींग’चा काही भाग खाली कोसळला.‘लोकमत’ने वेधले होते प्रशासनाचे लक्षजिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने नाल्याच ठेवल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात जाऊन नुकसान होण्याची शक्यता ‘लोकमत’ने २७ जूनच्या अंकात वर्तवून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, याऊपरही याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. २८ जून रोजी शेलुबाजार परिसरात धो-धो पाऊस झाला असून, या पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडाण नदी पात्रावर पूल बांधकाम सुरू असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या ठेवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेकडो एकर शेतीत पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यातील काही क्षेत्रात शेतकºयांनी पेरणीही केली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी