शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पाणीटंचाई निवारण योजना ठरताहेत ‘तकलादू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:10 IST

मालेगाव (वाशिम): शहरासह तालुक्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. त्यानुसार, पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठका होऊन टंचाई निवारणार्थ लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तकलादू स्वरूपातील या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असून पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज भासत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

ठळक मुद्देदरवर्षी लाखो रुपये खर्चमालेगावात यंदाही उद्भवली भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): शहरासह तालुक्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. त्यानुसार, पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठका होऊन टंचाई निवारणार्थ लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तकलादू स्वरूपातील या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असून पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज भासत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.पाणीटंचाई निवारणसंदर्भात दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आढावा बैठक घेवून विहीर अधिग्रहण, हातपंप दुरुस्तीची कामे केली जातात. याऊपरही अनेक गावांमधील नागरिकांवर दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचायत समिती स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, चालूवर्षी ४२ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. पाणीटंचाईचे हे प्राथमिक स्वरूप लक्षात घेऊन प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्या तात्पुरत्या न ठेवता कायमस्वरूपी असाव्यात, अशी मागणी तालुक्यात होत आहे.पाणीपुरवठा योजनांची कामे अर्धवट स्थितीत!मालेगाव तालुक्यात आदिवासी बहुल भागात विकास उपाययोजनांतर्गत पाणीपुरवठ्याची ८ कामे मंजूर असून त्यापैकी केवळ २ कामे पूर्ण झाली आहेत. माळेगाव आणि किन्ही या गावांमध्ये जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असून धरमवाडी, वाकळवाडी, भौरद उमरवाडी आणि खैरखेडा येथे काम अद्याप जलकुंभ उभारण्यास सुरूवात झालेली नाही. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केवळ शिरपूरचे काम पूर्ण झाले आहे. अमानी येथे वीज जोडणीअभावी पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.चाकातिर्थवरून कुरळा धरणात पाणी सोडणे गरजेचे!पुर्वी ग्रामपंचायत असलेल्या मालेगावला आता नगर पंचायतीचा दर्जा मिळालेला आहे. असे असताना अद्याप शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. कुरळा धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो; परंतु तो फार काळ पुरणार नाही. त्यामुळे चाकातिर्थवरून कुरळा धरणात पाणी सोडल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. त्यासाठी नगर पंचायतीने सक्रीय पुढाकार घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी