शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

वाशिम : पाणीटंचाई निवारण योजना ठरताहेत ‘तकलादू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:10 IST

मालेगाव (वाशिम): शहरासह तालुक्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. त्यानुसार, पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठका होऊन टंचाई निवारणार्थ लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तकलादू स्वरूपातील या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असून पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज भासत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

ठळक मुद्देदरवर्षी लाखो रुपये खर्चमालेगावात यंदाही उद्भवली भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): शहरासह तालुक्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. त्यानुसार, पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठका होऊन टंचाई निवारणार्थ लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तकलादू स्वरूपातील या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असून पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज भासत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.पाणीटंचाई निवारणसंदर्भात दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आढावा बैठक घेवून विहीर अधिग्रहण, हातपंप दुरुस्तीची कामे केली जातात. याऊपरही अनेक गावांमधील नागरिकांवर दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचायत समिती स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, चालूवर्षी ४२ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. पाणीटंचाईचे हे प्राथमिक स्वरूप लक्षात घेऊन प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्या तात्पुरत्या न ठेवता कायमस्वरूपी असाव्यात, अशी मागणी तालुक्यात होत आहे.पाणीपुरवठा योजनांची कामे अर्धवट स्थितीत!मालेगाव तालुक्यात आदिवासी बहुल भागात विकास उपाययोजनांतर्गत पाणीपुरवठ्याची ८ कामे मंजूर असून त्यापैकी केवळ २ कामे पूर्ण झाली आहेत. माळेगाव आणि किन्ही या गावांमध्ये जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असून धरमवाडी, वाकळवाडी, भौरद उमरवाडी आणि खैरखेडा येथे काम अद्याप जलकुंभ उभारण्यास सुरूवात झालेली नाही. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केवळ शिरपूरचे काम पूर्ण झाले आहे. अमानी येथे वीज जोडणीअभावी पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.चाकातिर्थवरून कुरळा धरणात पाणी सोडणे गरजेचे!पुर्वी ग्रामपंचायत असलेल्या मालेगावला आता नगर पंचायतीचा दर्जा मिळालेला आहे. असे असताना अद्याप शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. कुरळा धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो; परंतु तो फार काळ पुरणार नाही. त्यामुळे चाकातिर्थवरून कुरळा धरणात पाणी सोडल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. त्यासाठी नगर पंचायतीने सक्रीय पुढाकार घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी