वाशिमचे युवक वळले मत्स्य व्यवसायाकडे!

By Admin | Updated: September 20, 2016 01:08 IST2016-09-20T01:08:09+5:302016-09-20T01:08:09+5:30

तीन वर्षानंतर यंदा प्रथमच धरणे भरली तुडुंब; जिल्हय़ात मत्स्योत्पादनाला मिळतेय चालना.

Washim turned to fishery business! | वाशिमचे युवक वळले मत्स्य व्यवसायाकडे!

वाशिमचे युवक वळले मत्स्य व्यवसायाकडे!

वाशिम, दि. १९ - सन २0१३ ते २0१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. यंदा मात्र दमदार पावसामुळे जिल्हय़ातील सर्वच धरणे पाण्याने तुडुंब भरल्याने मत्स्यव्यवसायाला पुन्हा एकवेळ ह्यअच्छे दिनह्ण आले असून या व्यवसायाकडे भोई समाजातील असंख्य युवक वळले आहेत.
गत तीन वर्षात पावसाने मोठा दगा दिल्यामुळे भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला होता. यावर्षी मात्र सुरुवातीपासून दमदार स्वरूपात कोसळलेल्या पावसामुळे जिल्हय़ातील ३ मध्यम आणि १२२ लघू प्रकल्प तुडुंब भरले असून यामध्ये चालणार्‍या मत्स्यव्यवसायाला अचानक गती प्राप्त झाली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणार्‍या या समाजातील अधिकांश कुटुंब मच्छीमार असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष बाब म्हणजे युवक वर्गही आता या व्यवसायाकडे वळला असून निसर्गाने चांगली साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी आशा या व्यवसायातील युवकांनी व्यक्त केली.

Web Title: Washim turned to fishery business!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.