शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

वाशिम : रिसोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; प्रकल्पाने गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 8:07 PM

रिसोड - रिसोड तालुक्यातील १७ प्रकल्पांनी तळ गाठला असून, जवळपास ६५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना नसल्याने, गावक-यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिकांची पाण्यासाठी भटकंती उपायययोजना शून्य

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड - रिसोड तालुक्यातील १७ प्रकल्पांनी तळ गाठला असून, जवळपास ६५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना नसल्याने, गावक-यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सन २०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. विहिरी व बोअरवेलची जलपातळीदेखील समाधानकारक नव्हती. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागली होती. डिसेंबर महिन्यात प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा जाहिर केला. त्याअनुषंगाने पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. रिसोड तालुक्यात अद्याप काही गावातील विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. दुसरीकडे तालुक्यातील १७ प्रकल्पांनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शेतातील विहिरींवरून पाणी आणण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. मजूरवर्गाला सकाळच्या वेळी कामधंदे सोडून पाणी आणण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना करणे अपेक्षीत असताना, याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष नागरिकांची चिंता वाढविण्यास पुरेसे ठरत आहे. नळ पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती, तात्पुरती नळ योजना, विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा, पाणीपुरवठा योजनांचे पुनरूज्जीवन आदी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गाावकºयांना अपेक्षीत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी