शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

वाशिम : समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी भूसंपादनाचा अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:25 IST

वाशिम:  जिल्हय़ातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, समृद्धी महामार्ग निर्मितीत हा मुद्दा प्रमुख अडथळा ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देभूसंपादन प्रक्रिया धीम्या गतीनेविविध स्वरूपातील अडचणींमुळे प्रशासनही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  जिल्हय़ातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, समृद्धी महामार्ग निर्मितीत हा मुद्दा प्रमुख अडथळा ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २0१५ रोजी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीची घोषणा केली होती. त्यानुसार, जानेवारी २0१८ पासून या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र प्रारंभी शेतकर्‍यांनी दर्शविलेला प्रखर विरोध आणि त्यानंतर उद्भवलेल्या विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्यापपर्यंत भूसंपादन प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने पुढच्या कामाचे भवितव्यही अधांतरी लटकले आहे. समृद्धी महामार्गासाठी सध्या ‘रेडी रेकनर’प्रमाणे तथा सरळ खरेदी पद्धतीने वाशिम जिल्हय़ात भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे; मात्र आदिवासी, भूदान यासह इतर स्वरूपातील शेकडो हेक्टर जमिनींच्या संपादनादरम्यान प्रशासनाला विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करावा लागत असून, वादात सापडलेल्या अनेक ठिकाणच्या जमिनींची न्यायालयीन प्रकरणे निकाली काढताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे वाशिम जिल्हय़ात ५४ टक्के भूसंपादन प्रक्रिया आटोपल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कृषी समृद्धी केंद्र उभारण्यास ‘बगल’!राज्य शासनाकडून समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर प्रारंभी शेतकर्‍यांचे हित जोपासण्याचा कांगावा करीत समृद्धी महामार्गादरम्यान ठिकठिकाणी कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचे निश्‍चित झाले होते. त्यात महामार्गासाठी जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांना २५ टक्के विकसित भूखंड, पाल्यांना उच्च शिक्षणात सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कुटुंबाचा समावेश, शासकीय/निमशासकीय वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जाची माफी आदी लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. सध्या मात्र कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचा विषय बासनात गुंडाळून ठेवत केवळ महामार्गासाठी लागणारी जमिनच सरळ खरेदी पद्धतीने संपादित केली जात आहे. शेतकर्‍यांकडून होणारा विरोध संपुष्टात आणण्यासाठी शासनाने हा मधला मार्ग काढल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हय़ात समृद्धी महामार्गाचे अंतर ९७ किलोमीटर असून, ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण, दगड रोवणी यासह संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण करून भूसंपादनाचे काम सध्या सुरू आहे. ५४ गावांपैकी २0 पेक्षा अधिक गावांमधील जमिनींचे संपादन झाले असून, उर्वरित गावेही लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.- सुनील माळीक्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गwashimवाशिम