शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वाशिम : शेतक-यांच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात जलवाहिनीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:26 AM

वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता  देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतक-यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाइपलाइन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. 

ठळक मुद्देजलवाहिनीच्या कामास प्रारंभ पोलीस अधिकारी, आरसीपी प्लाटून तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता  देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतक-यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाइपलाइन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणा-या ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले होते. दरम्यान, २१ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांसह इतर हजारो नागरिकांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.  शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि शेतक-यांना बारमाही पिके घेता येणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. असे असताना बॅरेजेस परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता वाशिम शहराला बॅरेजेसमधून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप कोकलगाव परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केला होता. बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पुरविणे अन्यायकारक असून, वाशिमला न देण्यासाठी तीव्र विरोध वाढला होता. या विरोधामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांनी वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना अंतर्गत पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरिता पोलीस अधीक्षकांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यासाठी पोलीस अधीक्षकांनी ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, १३ महिला कर्मचारी व एक आरसीपी प्लाटून असा तगडा बंदोबस्त कामाच्या ठिकाणी तैनात केला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पाइपलाइनच्या कामाला शुक्रवारला प्रारंभ झाला असून, कोणत्याही प्रकारचा त्याठिकाणी अनुचित प्रकार घडला  नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  

शेतक-यांनी केले होते  विविध टप्प्यात आंदोलन पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता सोडू नये, या आग्रही मागणीसाठी यापूर्वी बॅरेज परिसरातील शेतकºयांनी विविध टप्प्यात आंदोलने केली होती. सुरुवातीला जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. त्यानंतर बॅरेज परिसरात पाण्यात जाऊन अनोखे आंदोलन छेडले होते. १५ फेब्रुवारीदरम्यान ५-६ दिवस वाघोली फाट्यावर साखळी उपोषण केले होते. २१ फेब्रुवारी रोजी हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले होते.   बॅरेज परिसरातील शेतक-यांचा प्रचंड विरोध पाहता पोलीस बंदोबस्तात  पाइपलाइनच्या कामाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. 

टॅग्स :washimवाशिम