शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

वाशिम जिल्ह्यात दिवसाकाठी ४० रोहित्र नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 12:29 IST

Mahavitran News २४ नोव्हेंबर रोजीपर्यंत २८२ रोहित्र बंद पडले असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. वाढत्या वीजभारामुळे दिवसाला सरासरी ४० रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे शेतकºयांना सिंचनात अडचणी येत आहेतच शिवाय बंद पडणाºया रोहित्रांमुळे महावितरणची डोकेदुखीही वाढली आहे. जिल्ह्यात २४ नोव्हेंबर रोजीपर्यंत २८२ रोहित्र बंद पडले असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीज पुरवठा देण्याच कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमीअधिक दाबामुळे रोहित्र जळण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रांतील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. तथापि, रब्बी हंगामाला सुरुवात होताच या प्रकारात लक्षणीय वाढ होते. सद्यस्थितीत हीच समस्या शेतकरी आणि महावितरणला त्रस्त करून सोडत आहे. रब्बी हंगामासाठी विजेची मागणी वाढली असताना रोहित्रांवर भार वाढून दिवसाला सरासरी ४० तर महिन्याकाठी ७०० ते ८०० रोहित्र नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात विविध वीज उपकेंद्रांतर्गत मिळून २८२ वीज रोहित्र बंद असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.

अनधिकृत जोडण्या आणि विजेच्या वाढलेल्या वापरामुळे रोहित्र बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रोहित्र दुरुस्त करून ऑईल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.-आर. जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणAgriculture Sectorशेती क्षेत्र