शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

४८६ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील ...

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघत असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पातळीवरील पॅनलप्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक विभागाने या मतदान प्रक्रियेसाठी जय्यत तयारी केली असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला आहे. यात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड मिळून २५५२ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

--------

कोट : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर वीजपुरवठ्यासह सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित मतदार, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी मतदान संपण्याच्या पूर्वी अर्धा तासाची वेळ ठेवण्यात आली असून, यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

- सुनील विंचनकर,

निवडणूक निर्णय अधिकारी

-------

संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष

जिल्ह्यात ५० संवेदनशील आणि ११ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असून, येथे मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार, वादविवाद होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय फिरते पथकही भेटी देऊन पाहणी करणार आहे.

--------

१८ जानेवारी रोजी निकाल

जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर तालुकास्तरावर १७ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

-----

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. यात मतदान कालावधी संपण्याच्या आधी बाधित मतदारांसह बाधित आढळणारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी अर्धातास मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट उपलब्ध करून दिली जाणार आहे.