शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

vidhan sabha 2019 : आघाडी, युतीला बंडखोरांची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:57 PM

ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच, इच्छूकांनी दंड थोपटत आपलीच उमेदवारी प्रबळ असल्याचा दावा केला आहे. एकापेक्षा एक वरचढ दावेदार असल्याने आणि सेना-भाजपा किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, युतीची घोषणा झाली नसल्याने तुर्तास तरी प्रत्येकाने स्वतंत्रपणे मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते. ऐनवेळी युती, आघाडी झाली तर इच्छूकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तिनही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या इच्छुकांनी संपर्क मोहिमा सुरू केल्याचे दिसून येते. गत विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघ हा काँग्रेसकडे तर वाशिम व कारंजा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा विजय साकारला होता.गतवेळेप्रमाणे यावेळीही प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार की युती, आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर युतीचे संकेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना युतीबाबत दोन्ही पक्षात साशंकता असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग देत गॉड फादरच्या भेटीसाठी मुंबई, दिल्ली वारी सुरू केली आहे.ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. पक्षाची उमेदवारी मिळाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर एकदा नशीब अजमावायचे, असा निर्धार कारंजा मतदारसंघात इच्छूकांनी केल्याची चर्चा केला. युतीत कारंजा मतदारसंघ भाजपाकडे गेला तर शिवसेनेचे इच्छूक प्रकाश डहाके नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर येथे बंडखोरीचे चित्र अवलंबून राहील तर दुसरीकडे शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेला तर आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुनर्वसन कसे करायचे हा प्रश्न भाजपापुढे राहील.रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमित झनक यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख हे पूत्र नकुलसाठी कोणती भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील चित्र अवलंबून राहणार आहे. रिसोड मतदारसंघ हा भाजपाकडे गेला तर शिवसेना व शिवसंग्रामच्या इच्छूकंकडून बंडखोरी होणार नाही, याची दक्षता घेताना भाजपाच्या दिग्गजांची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेना, भाजपाकडे ताकदीचे उमेदवार; थांबवायचे कुणाला ?गेल्या पाच वर्षात शिवसेना व भाजपने तिनही मतदार संघात तगड्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना तयारी करण्याचे आदेश दिले होते; त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना व भाजपकडे ताकदीचे उमेदवार आहेत. आता युती झाली तर थांबवायचे कुणाला, असा पेच आहे. ‘बंडोबां’चे बंड थंड करण्याचे आव्हान शिवसेना-भाजपाच्या पक्षनेतृत्वासमोर राहणार आहे.

‘वंचित’कडून चाचपणीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता तुर्तास तरी धुसर असल्याने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात उमेदवार उभे करून तिसरा पर्याय देण्याची तयारी वंचितकडून चालविली जात आहे. सेना, भाजपा तसेच काँग्रेस, राकाँची युती, आघाडीची घडी विस्कटली तर रिसोड व कारंजा मतदारसंघात एखाद्या बंडखोराच्या गळ्यात वंचितची उमेदवारी पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना