शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

न उगवलेल्या बियाण्यांच्या पडताळणीचे अहवाल प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 11:29 AM

तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी विभागाच्या सुचनेनुसार यंदाच्या हंगामात न उगवलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना तातडीने बदलून द्यावे लागणार आहे. तथापि, आठवडा उलटून गेला तरी, तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. शिवाय, त्यातच अद्यापही न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाचा गोंधळ उडत आहे.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पाहणी करीत आहेत. आता या संदर्भात विशेष नमुन्यात अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करावा लागणार आहे; परंतु कृषी विभागाची पाहणीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अहवाल प्रलंबित आहे.

शेतकºयांसह कंपनीलाही अहवालजिल्ह्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, किती क्षेत्रावर बियाणे उगवले नाही. बियाणे न उगवण्याच कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल संबंधित शेतकरी आणि बियाणे उत्पादक कंपनीलाही सादर करावा लागणार आहे. बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकरी त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याशिवाय शासनस्तरावर सादर करण्यासाठीही एक सर्वकश अहवाल तालुकास्तर समितीला तयार करावा लागणार आहे.

न उगवलेल्या बियाण्यांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्याच अहवाल तयार करीत आहेत. जिल्ह्यात वाढत असलेल्या तक्रारींमुळे ही प्र्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. शिवाय अहवालाची प्रक्रिया अत्यंत बारकाईने पूर्ण करावी लागणार आहे.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

 

टॅग्स :FarmerशेतकरीwashimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र