शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

हातमागावरील घोंगडीची कला त्यांनी ठेवली जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 2:10 PM

४० वर्षांपासून व्यवसाय: मंगरुळपीर तालुक्यातील पांडुरंग कोल्हेंचा उपक्रम 

-गोपाल माचलकर  पार्डी ताड: मेंढीच्या लोकरा पासून हातमागावर बनणारी घोंगडी आता कालबाह्य झाली असली तरी, मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ६८ वर्षीय पांडुरंग कोल्हे यांनी मात्र गेल्या ४० वर्षांपासून ही कला जिवंत ठेवली आहे. या व्यवसायावर उदरनिर्वाह होणे कठीण असले तरी, कला जिवंत राहावी म्हणूनच ते हा व्यवसाय करीत असून, याचे प्रशिक्षण इतरांनीही घ्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. हातमागावर घोंगड्या बनविणे हा पार्डी ताड येथील पांडुरंग कोल्हे यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेली ४० वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. यासाठी मेंढीचे लोकर अर्थात केस आणण्यासाठी त्यांना परिश्रम करावे लागतात. या लोकरीपासून घोंगडीसाठी धागा तयार करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो आणि अखंडा धागा बनल्यानंतर त्यापासून घोंगडी तयार करण्यासाठी दोन दिवस लागतात.

अर्थात एका घोंगडीसाठी त्यांना आठ दिवस परिश्रम करावे लागतात. धागा तयार केल्यानंतर तो चिंचेच्या पाण्यात भिजवून उन्हात वाळविला जातो. त्यानंतर हा धागा सुरळीत करण्यासाठी फणीने विंचरले जाते. मगच धागा हातमागावर उभा, आडवा लावून त्यापासून घोंगडी बनविली जाते. मेंढीच्या लोकरापासून बनलेली घोंगडी उबदार असल्याने शेतकरी वर्गात पूर्वी या घोंगडीला मोठी मागणी होती; परंतु आधुनिक काळात उबदार शाली आणि चादरींची निर्मिती झाल्यानंतर या घोंगडीची मागणी घटली आहे. त्यामुळे हातमागावर घोंगडी बनविणा-या विणकरांची संख्याही आता बोटावर मोजण्याएवढीच उरली आहे; पांडुरंग कोल्हे यांनी मात्र ४० वर्षांपासून ही कला जपली आहे. त्यांनी बनविलेल्या एका घोंगडीचे बाजार मुल्य १३०० रुपये असले तरी, त्यामधून त्यांची मिळकत मात्र अगदीच नगण्य आहे. मंगरुळपीर तालुक्यात हा व्यवसाय करणारे पांडुरंग कोल्हे हे एकमेव असले तरी, शासनाकडून मात्र त्यांच्या कलेची उपेक्षाच होत आहे.  शासनाने कलेची जोपासना करावी ! मेंढ्यांच्या लोकरापासून घोंगड्या बनविण्याची कला ही पारंपरिक आणि अनन्य साधारण असून, पर्यावरणपुरक अशीच आहे. या कलेची जोपासणा करून विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हातमागावर घोंगडी विणण्याचा व्यवसाय वृद्धीगंत होऊन लोकांना रोजगाराचा नवा पर्याय मिळेल. त्यामुळे शासनाने या कलेचा विकास करून ती जोपासण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पांडुरंग कोल्हे यांनी केली आहे.