शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पश्चिम वऱ्हाडात दोन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:26 IST

वाशिम: पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असण्यासोबतच इतर कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी दरवर्षी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते. मात्र, अलिकडच्या काळात नियमित सर्वेक्षण नसल्याने झोपडपट्टी व दुर्गम भागातील मुले शिक्षणापासूच दूरच राहत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे शिक्षण विभागाकडून पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात ४ जुलै २०१५ रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १११३ मुले शाळाबाह्य आढळली होती.शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते.

वाशिम: पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असण्यासोबतच इतर कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी दरवर्षी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते. मात्र, अलिकडच्या काळात नियमित सर्वेक्षण नसल्याने झोपडपट्टी व दुर्गम भागातील मुले शिक्षणापासूच दूरच राहत असल्याचे दिसून येते. शिक्षण विभागाकडून पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात ४ जुलै २०१५ रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १११३ मुले शाळाबाह्य आढळली होती. त्यांना रितसर प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशही देण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून आजतागायत हे सर्वेक्षण झालेले नाही. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, तो नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचे प्रयत्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार, शिक्षण विभाग तसेच प्रशासनाच्या सर्व विभागांच्या वतीने ४ जुलै २०१५ रोजी शाळाबाह्य मुलांचे एकदिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी १११३ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होते. मात्र, तेव्हापासून या सर्वेक्षणास सपशेल ‘कोलदांडा’ देण्यात आला. जेव्हा की, आजही इमारत बांधकामस्थळी तथा शहराबाहेरील मोकळ्या जागांमध्ये पाल मांडून वास्तव्य करणाºया कुटूंबांसह शेतमळे आणि जंगलात वास्तव्य करणाºया कुटूंबातील अनेक मुले शाळा आणि शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेता, शिक्षण विभागाने पुन्हा एकवेळ शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी सुज्ज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.शासनाच्या निर्देशानुसार २ वर्षांपूर्वी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून मात्र ही मोहिम राबविण्यात आलेली नाही. असे असले तरी आगामी जुन महिन्यापासून पुन्हा एकवेळ मोहिम राबवून शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल. - अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प., वाशिम

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिक