शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

प्रशासनही हतबल : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा १९७ कोटींचा निधी पडून

By सुनील काकडे | Published: October 09, 2022 6:58 PM

क्षेत्रीय संघटनांचे आडमुठे धोरण; शेतकऱ्यांना मदत वाटप करणार कोण?

वाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख २७२ शेतकऱ्यांच्या १ लाख ६४ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक असलेल्या २२३ कोटी ७५ लाखांच्या अनुदानापैकी १९७ कोटी २३ लाख ८४ हजार २२४ रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले; मात्र हा मदतनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या कामावर क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या या आडमुठ्या धोरणापुढे प्रशासनही हतबल झाले असून ऐन दिवाळीत शेतकरी आत्महत्या वाढण्यास ही बाब कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात जुलै २०२२ मध्ये मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यातील १२९७ हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सहाही तालुके बाधित होत तब्बल १ लाख ४३ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले; तर सप्टेंबर महिन्यात मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यांमधील १९ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे जबर नुकसान झाले.

यादरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सर्वे व पंचनामे केल्यानंतर १ लाख ६४ हजार ११४ बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी २२३ कोटी ७५ लाखांचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडून पाठविण्यात आला. शासनस्तरावरूनही वेळीच दखल घेत १९७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला पाठविण्यात आला. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या कामावर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांच्या क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शासनाकडून पैसा येऊनही तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी