शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:14 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहेजिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन आॅनलाईन अर्ज भरण्याला केवळ पाच दिवस शिल्लक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने २००९ पासून ते ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्जमाफी जाहिर केलेली आहे तसेच सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्यात आले. याशिवाय नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत अथवा २५ टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून १५ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन अशा ठिकाणी शेतकºयांना मोफत स्वरुपात आॅनलाईन अर्ज व घोषणापत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याला केवळ पाच दिवस शिल्लक असून, अनेक शेतकºयांना तांत्रिक बिघाडामुळे अद्याप अर्ज भरता आले नाहीत. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान याचा लाभ मिळविण्यसाठी आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. ८ सप्टेंबरपर्यंत १ लाख ७८ हजार शेतकºयांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केली होती. यापैकी १ लाख ३० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरले गेलेले नाहीत. याशिवाय काही शेतकºयांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही. या सर्व शेतकºयांना महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. ग्रामीण भागात सर्व्हर डाऊन होणे, ‘थम्ब’ न घेणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे.