शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पाणीटंचाईमुळे खालावतोय मार्गांच्या कामाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 3:13 PM

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील दळणवळण सुविधा अद्ययावत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांसह काही जिल्हामार्गांची कामे करण्यात येत आहेत; परंतु जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे. खडी, मुरूम या गौणखनिज त्यामुळे उघडे पडत असून, याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. जिल्ह्यात वाशिम-कारंजा, महान-मानोरा, कारंजा-मानोरा, मालेगाव-मेहकर हे राष्ट्रीय महामार्ग, तसेच शेलुबाजार ते वाशिमसह काही जिल्हा मार्गांचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे; परंतु जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक प्रकल्पांत ठणठणाट असल्याने जनतेचीच तहान भागणे कठीण झाले आहे. त्यामुळे मार्गाच्या कामासाठी पाणी आणावे कोठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय महामार्गांची कामे रासायनिक द्रव्याच्या वापराने होत असल्याने या कामांत पाण्याची आवश्यकता खूप कमी आहे; परंतु या मार्गासाठीचे समतलीकरण आणि जिल्हा मार्गाच्या समतलीकरण प्रक्रियेत गौणखनिजाची योग्य दबाई करणे आवश्यक असून, यासाठीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या अडचण ठरत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी, मुरूम उघडा पडत आहेच शिवाय मोठ्या प्रमाणात धुळही उडत आहे. याचा त्रास वाहनधारक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे; परंतु आवश्यक प्रमाणात पाणीच नसल्याने ही समस्या दूर करून कामांचा दर्जा सुधारावा कसा, असा प्रश्न कंत्राटदारांनाही पडला आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई