शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त ११ गावांना मिळाली जलसंजीवनी

By admin | Updated: April 7, 2015 02:08 IST

कमी खर्चात शाश्‍वत जलसंधारणाची सोय; भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे यश.

सुनील काकडे / वाशिम: जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडविण्याकरिता भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सन २0१३-१४ मध्ये महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील ११ गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. ह्यआपलं गाव आपलं पाणीह्ण, या नावाने भूजल सर्वेक्षण यंत्रणेने हाती घेतलेल्या या योजनेमुळे नेहमी टंचाईग्रस्त म्हणून गणल्या जाणार्‍या या गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. वाशिम जिल्हय़ाची भूरचना दख्खनच्या पठारापासून तयार झालेली आहे. जिल्हय़ात पैनगंगा, पूस, अरुणावती, अडाण, बेंबळा या नद्या आहेत. असे असले तरी पैनगंगा ही मुख्य नदी बुलडाणा जिल्हय़ातून उगम पावून वाशिम जिल्हय़ातून पुढे वाहत जाते. उर्वरित नद्यांचा उगम येथून आहे; मात्र त्याचा जिल्हय़ातील सिंचनासाठी फारसा उपयोग होत नाही. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी साठविण्याकरिता जिल्हय़ात तुलनेने मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. बेसाल्ट खडकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी पुढे वाहून जाते. या सर्व प्रतिकूल बाबींमुळेच जिल्हय़ातील शेकडो गावांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यासोबतच सिंचनाचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सन २0१३-१४ मध्ये ह्यआपलं गाव आपलं पाणीह्ण ही नावीन्यपूर्ण योजना आखून सुदी, भोयता, कवठा खुर्द, सावरगाव फॉरेस्ट, गोंडेगाव, पिंपळशेंडा, साखरा, सावंगा, चिंचोली, चकवा, मसलापेन या ११ गावांमध्ये ह्यगॅबियनह्ण बंधारे तयार केले. यासाठी मानव विकास मिशनमधून १ कोटी, जिल्हा वार्षिक विकास निधीतून १ कोटी आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाकडून ३0 लाख रुपये मंजूर झाले होते. प्रती बंधारा २0 लाख रुपये खचरून हे काम करण्यात आले. याअंतर्गत संबंधित गावांमध्ये उपलब्ध जागेवर एक ते दीड किलोमीटर अंतरावर ८ मीटर रुंद आणि ३ मीटर खोल ह्यगॅबियनह्ण पद्धतीचे बंधारे खोदण्यात आले. ठरावीक अंतरावर ३0 फूट, ६0 फूट आणि १00 फुटाचे बोअर खोदून जमिनीखालच्या खडकाला ब्लास्ट करण्यात आले. जमिनीच्या पोटातील खडकाच्या सांध्यात साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नसल्याने ते जमिनीत अधिक काळ टिकून राहावे आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढावी, या यामागील उद्देश होय. भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा हा प्रयोग अकराही गावांमध्ये यशस्वी झाला आहे. यामुळे सदर गावांमधील विहिरी हातपंपांची पाणीपातळी वाढली असून, बंधार्‍यात साठलेल्या पाण्याचा सिंचनासाठीदेखील उपयोग झाला. सुदी या गावात सुमारे १00 ते १५0 एकर जमिनीला या बंधार्‍यामुळे पाणी मिळाले.