शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

सव्वाशे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 5:35 PM

देपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती. या संदर्भात शासन, प्रशासनदरबारी पाठपुरावा केल्यानंतर अखेर पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेत शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू केले आहे. वारा जहॉगिर येथे २०१५ मध्ये पाटबंधारे विभागाच्यावतीने लघू प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा देपूळ ते पार्डी रस्ता बुडित क्षेत्रात गेला. त्यामुळे १३० शेतकºयांची हजारो एकर शेती संकटात सापडली. शेतीत शेतमाल, शेती अवजारे आणि इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर ही वाहने नेणेच शेतकºयांना अशक्य झाले. परिणामी अनेकांची शेती पडित राहू लागली होती. पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी या रस्त्यासाठी नियोजन न केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. त्यानंतर शेतकºयांनी बुडित क्षेत्रात गेलेल्या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजविले, जिल्हाधिकाºयांसह प्रशासन दरबारीही निवेदन दिले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे विद्यमान कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव यांनी या रस्त्यामुळे होत असलेली शेतकºयांची अडचण लक्षात घेतली आणि रस्त्याच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेची तरतूद केली. तथापि, सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने रस्त्याचे कामही रखडणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करीत वरिष्ठस्तरावरून रस्ता कामासाठी परवानगी घेत निविदा प्रक्रिया पूर्ण केली. आता या रस्त्याचे कामही सुरु झाले असून, या रस्त्यामुळे परिसरातील १३० शेतकºयांच्या शेती वहितीचा प्रश्न निकाली लागला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीDamधरण