शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 4:37 PM

बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे.

लोकमत न्युज नेटवर्क राजुरा (वाशिम) : खरीप पेरणी तोंडावर असतांना शेतकरी वर्ग बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी आर्थिक जुळवा जुळव करण्यात गुंतला आहे, मात्र गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे.गत वर्षी खरीप पिकावर किडीचा प्रादूर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देतांना  बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र  दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, उडीद, मुग, आदि पिकांची मोठी हानी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला मोड फुटले. ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. त्यानंतर  कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊन संचारबंदीचा फटका भाजीपाला, फळ, उत्पादकांना बसला. थकबाकीदार शेतकºयांच्या पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम असल्याने खरिपाचे पीककर्ज वाटप अद्यापही प्रलंबीत आहे. परिणामी शेतकºयाना खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यात अनुदानावर खते, बियाणे मिळण्याची आशा धुसर दिसत असताना बियाणे दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणे विविध वानाची बॅग, १ हजार ७०० रुपये ते १ हजार ९०० पन्नास रुपयांपर्यंत भाव होते तर या वर्षी २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपये प्रती बॅगेचे दर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी उडीद, मूग, बियाणे प्रती किलो १२० रुपये होते, यंदा मात्र  हे बियाणे प्रति किलो १८० रुपयांपर्यंत वाढले आहे, तर तुरीच्या बियाण्यात सुध्दा १० ते २० रुपये प्रती किलो भाववाढ झाल्याचे समजते.

दरवर्षी उदभवणाºया अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकºयांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच  यावर्षी बियाणे दरवाढीचे संकट शेतकºयासमोर उभे ठाकल्याने शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. - अनिल अहाळे,शेतकरी, राजुरा 

  ओल्या दुष्काळाने खरीपातील सोयाबीन पावसात भिजले त्यामुळे, कंपन्यामध्ये अपेक्षीत बियाणे उत्पादन होऊ शकले नाही यावर्षी सोयाबीन बियाणे दरात मोठी वाढ झाली.कैलास भांडेकर, संचालक, माऊली कृषी सेवा केंद्र, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी