शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

थकीत रक्कम वसुलीसाठी शाळांचा पालकांना तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:11 IST

Washim School News शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेना संसर्गामुळे अचानक बंद झालेल्या शाळांमुळे अनेक पालकांची आपल्या पाल्यांची शाळेची फी भरायची राहली हाेती. ही रक्कम शाळाच न झाल्याने मागितल्या जाणार नसल्याचे पालकांना वाटत असतानाच शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. काेराेना संसर्ग पाहता शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाने आवाहन केले हाेते. त्यामुळे शाळा बंद राहिल्यात. अशावेळी शाळांनी ऑनलाइन क्लासेसवर भर देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. काेणत्याच प्रकारची परीक्षा न हाेता विद्यार्थी पुढच्या वर्गात पाठविण्यात आले; परंतु पालकांचे म्हणणे आहे की, मुले शाळेतच गेली नाहीत व परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत, तर मग पैस कसे द्यायचे; परंतु शाळा संचालक वेगवेगळया क्लृप्त्या लढवून पालकांमागे पैशांसाठी तगादा लावत असल्याचे दिसून येत आहे. संस्थाचालकांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन क्लासेस घेतल्याने शिक्षकांना पगार करावाच लागला, शिवाय विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षासुद्धा घेण्यात आली. त्यामुळे शिक्षकांचे पगार केल्याने फी भरावीच लागणार आहे. नाहीतर आपल्या पाल्यांना ओळखपत्र दिले जाणार नाही. परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे सांगण्यात येत असल्याने पालकांकडे काेणत्याच प्रकारचा इलाज नसल्याने पालक नाइलाजास्तव पैसे भरताना दिसून येत आहेत. याकडे शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे. अनेक पालकांचा शिक्षण संस्थाचालकांशी यावरून वादसुद्धा उद्‌भवत आहे. केवळ मुला- मुलींच्या भवितव्याचा विचार करता पालक गप्प असल्याचे एका पालकाने सांगितले, तसेच शिक्षण विभागाने यावर काहीतरी उपाययाेजना करावी व काेराेना काळातील फी न स्वीकारण्याची मागणी पालकांतून केली जात आहे.ज्या पालकांकडे गतवर्षीची पूर्णच रक्कम थकीत असेल त्यांच्याकडून काेराेनापूर्वीचीच फी आकारण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. पालक म्हणतात... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळात सक्तीने फी वसूल करू नये, असे शिक्षण विभागाचे निर्देश हाेते; परंतु आता शाळा पूर्ववत झाल्याने मागच्या थकबाकी वसुलीसाठी पालकांना वेठीस धरले जात असल्याचे अनेक पालकांनी सांगितले. यावर काही तरी मार्ग काढून शिक्षण विभागाने काेराेना काळातील फी माफ करावी, अशी मागणी हाेत आहे.

शाळा चालविण्यासाठी संस्थाचालकांनाही खर्च येताेय. त्याकरिता विदयार्यांची फी माफ करण्यात आलेली नाही. पालकांना फी दयावीच लागेल परंतु शाळांकडून सक्ती करणे चुकीचे आहे. काेणत्याही पालकांनी फी भरली नाही तर त्यांच्या पाल्यांना शाळेतून कदापी काढण्यात येणार नाही. शाळांनी पालकांना टप्प्याटप्प्याने फी मागून ती वसुल करावी. याकरिता विदयार्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याने शाळांना तशा सूचना देण्यात येतील. परंतु काेणत्याही विदयार्यांचे नुकसान हाेणार नाही.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा