शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

थकीत रक्कम वसुलीसाठी शाळांचा पालकांना तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:11 IST

Washim School News शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेना संसर्गामुळे अचानक बंद झालेल्या शाळांमुळे अनेक पालकांची आपल्या पाल्यांची शाळेची फी भरायची राहली हाेती. ही रक्कम शाळाच न झाल्याने मागितल्या जाणार नसल्याचे पालकांना वाटत असतानाच शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. काेराेना संसर्ग पाहता शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाने आवाहन केले हाेते. त्यामुळे शाळा बंद राहिल्यात. अशावेळी शाळांनी ऑनलाइन क्लासेसवर भर देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. काेणत्याच प्रकारची परीक्षा न हाेता विद्यार्थी पुढच्या वर्गात पाठविण्यात आले; परंतु पालकांचे म्हणणे आहे की, मुले शाळेतच गेली नाहीत व परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत, तर मग पैस कसे द्यायचे; परंतु शाळा संचालक वेगवेगळया क्लृप्त्या लढवून पालकांमागे पैशांसाठी तगादा लावत असल्याचे दिसून येत आहे. संस्थाचालकांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन क्लासेस घेतल्याने शिक्षकांना पगार करावाच लागला, शिवाय विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षासुद्धा घेण्यात आली. त्यामुळे शिक्षकांचे पगार केल्याने फी भरावीच लागणार आहे. नाहीतर आपल्या पाल्यांना ओळखपत्र दिले जाणार नाही. परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे सांगण्यात येत असल्याने पालकांकडे काेणत्याच प्रकारचा इलाज नसल्याने पालक नाइलाजास्तव पैसे भरताना दिसून येत आहेत. याकडे शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे. अनेक पालकांचा शिक्षण संस्थाचालकांशी यावरून वादसुद्धा उद्‌भवत आहे. केवळ मुला- मुलींच्या भवितव्याचा विचार करता पालक गप्प असल्याचे एका पालकाने सांगितले, तसेच शिक्षण विभागाने यावर काहीतरी उपाययाेजना करावी व काेराेना काळातील फी न स्वीकारण्याची मागणी पालकांतून केली जात आहे.ज्या पालकांकडे गतवर्षीची पूर्णच रक्कम थकीत असेल त्यांच्याकडून काेराेनापूर्वीचीच फी आकारण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. पालक म्हणतात... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळात सक्तीने फी वसूल करू नये, असे शिक्षण विभागाचे निर्देश हाेते; परंतु आता शाळा पूर्ववत झाल्याने मागच्या थकबाकी वसुलीसाठी पालकांना वेठीस धरले जात असल्याचे अनेक पालकांनी सांगितले. यावर काही तरी मार्ग काढून शिक्षण विभागाने काेराेना काळातील फी माफ करावी, अशी मागणी हाेत आहे.

शाळा चालविण्यासाठी संस्थाचालकांनाही खर्च येताेय. त्याकरिता विदयार्यांची फी माफ करण्यात आलेली नाही. पालकांना फी दयावीच लागेल परंतु शाळांकडून सक्ती करणे चुकीचे आहे. काेणत्याही पालकांनी फी भरली नाही तर त्यांच्या पाल्यांना शाळेतून कदापी काढण्यात येणार नाही. शाळांनी पालकांना टप्प्याटप्प्याने फी मागून ती वसुल करावी. याकरिता विदयार्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याने शाळांना तशा सूचना देण्यात येतील. परंतु काेणत्याही विदयार्यांचे नुकसान हाेणार नाही.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा