शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पोषण आहारात शाळांना तांदूळ मिळतोय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 4:38 PM

Washim News विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण करताना अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: शालेय पोषण आहार योजनेंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून शाळांना पुरविल्या जाणाऱ्या तांदळाचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी भरत आहे. शिक्षकांकडून या तांदळाचे वजन केल्यानंतर क्विंटलमागे १२ किलोची तफावत आढळून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण करताना अडचणी येत आहेत. शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना धान्याचा पुरवठा होतो. हा पुरवळा भारतीय खाद्यान्य महामंडळाकडून शासनाच्या गोदामात साठवणूक करून या योजनेतील धान्य आवश्यकतेनुसार शाळेत पोहोचविले जाते. यामध्ये मोठया लहान शाळांना विद्यार्थी संख्येनुसार धान्याचा पुरवठा होतो. त्यात तांदळाचे प्रमाण साधारण ५ ते ७ क्विंटल, असे राहते. हा तांदूळ  ५० किलो वजनाच्या पोत्यात भरलेला असतो. हा तांदूळ पोहोच करताना त्याचे वजन संबंधित वाहनमालक अथवा यंत्रणेकडून करून दिले जात नाही. हा तांदूळ उतरवून घेतल्यानंतर ५० किलोच्या पोत्यात साधारण ६ किलो तांदूळ कमी भरत असल्याने शिक्षकांना वितरण प्रक्रियेदरम्यान आढळून येत आहे. अर्थात दोन पोत्यांतील तांदूळ प्रत्येकी ३ किलो प्रमाणे विद्यार्थ्यांना वितरीत केल्यानंतर शंभर पैकी चार विद्यार्थ्यांना वितरीत करण्यास उरत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण कसे करावे, हा प्रश्न शिक्षकांना पडतो.

आमच्या शाळेत गेल्या काही महिन्यांपासून पोषण आहारांतर्गत मिळणाऱ्या तांदळाचे वजन एका कट्टयामागे ६ ते ८ किलो कमी भरते. त्यामुळे शाळेत सव विद्यार्थ्यांना समप्रमाणात तांदूळ वितरीत करण्यात अडचणी येत आहेत.

-राजेश मते, शिक्षक जि.प. शाळा, वाघोळा

पुरवठादारांकडून पोषण आहार योजनेत मिळणाऱ्या तांदळाचे वजन एका कट्टयामागे ४ ते ६ किलो कमी भरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या तांदळाचे वितरण करण्यात अडचणी येत असून, काही विद्यार्थ्यांना पदरच्या पैशातून तांदूळ आणून त्याचे वितरण करावे लागते.

-राजेश मोखडकर शिक्षक, जि.प.शाळा, सोहोळ

पोषण आहार योजनेंतर्गत तांदळाचे वजन कमी भरत असेल, तर पुरवठादारांना याबाबत विचारणा करून माहिती घेऊ. तसेच शिक्षकांनाही अडचणी येऊ नये म्हणून तांदूळाचे वजन करून देण्याच्या सुचनाही करू.

-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा