शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छतेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:46 IST

वाशिम : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार ...

वाशिम : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार १५ सप्टेंबरपासून जिल्ह्यात स्वच्छता सेवा अभियानांतर्गत गावे स्वच्छ, सुंदर करण्यावर भर दिला जात असून, हे अभियान २ ऑक्टोंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी सोमवारी दिली.

स्वच्छता सेवा अभियानांतर्गत १९ सप्टेंबरपर्यंत स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार, तसेच शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे बनविण्यात येणार आहेत. २० व २१ सप्टेंबरदरम्यान तालुका व ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय व सार्वजनिक इमारतींची स्वच्छता, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन त्याचे व्यवस्थापन, तसेच गावागावात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान गावागावात प्लास्टिक बंदीबाबत शपथ व ठराव मंजूर करणे, सरपंचांसोबत ई-संवाद साधणे, ओडीएफ प्लसबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात येईल, तर २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवसाचे आयोजन व गावे ओडीएफ प्लस घोषित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत गावे स्वच्छ सुंदर होण्यास मदत होणार आहे.

---------------------------नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकाऱ्यांवर जबाबदारी

या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायतस्तरावरील सरपंच व सदस्य, सर्व कर्मचारी, स्वयंसाहाय्यता बचत गट या सर्वांचा सहभाग घेण्यात यावा, या उपक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या आहेत. विविध उपक्रमांची अंमलबजावणी विहित वेळेत होण्यासाठी आणि जिल्हास्तरांवर अहवाल सादर करण्याची जबाबदारी गट समन्वयक व समूह समन्वयक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले कार्यक्रम व उपक्रमाचे संचलन करीत आहेत.