शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ग्रामीण भागातील कलावंतांना रंगमंच मिळायला हवा- यशवंत पद्मगीरवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 17:31 IST

नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत देविदास पद्मगीरवार यांच्याशी यासंदर्भात साधलेला साधलेला हा संवाद...

वाशिम: ग्रामीण भागात अनेक अस्सल कलावंत दडलेले आहेत. त्यांना रंगमंच मिळाला तर ते पूर्ण दिमतीने स्वत:ला सिद्ध करू शकतील, त्यांना आपली कला सादर करता येईल. नाट्य परिषदेच्या रुपाने अशा कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या तथा नाट्य चळवळ जीवंत ठेवणाºया व ग्रामीण भागातील कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करून देणाºया नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत देविदास पद्मगीरवार यांच्याशी यासंदर्भात साधलेला साधलेला हा संवाद...आपण नाट्यक्षेत्रात कधीपासून कार्य करित आहात ?- मी १९९२ पासून नाटयक्षेत्रात कार्य करीत आहे. बालपणापासूनच नाटक आवडायचे. गणपती उत्सवात त्यावेळी कलापथक, दंडार, नाटके व्हायची. तेंव्हाच आपणही नाटकात गेले पाहीजे असे मनोमन वाटायला लागले. माझे वडिल साहित्यीक होते. इलेक्ट्रॉनिक रिपेरिअरींगचा व्यवसाय करताना नाटकाला नैपथ्य, प्रकाश देण्याचे काम प्रथम केले. मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील काही ग्रामीण कलावंत नाटक करायचे, तेंव्हा अरविंद साखरकर यांच्या मार्गदर्शनात ह्यअमरज्योती ही बंधुत्वाचीह्ण या नाटकात प्रथम मी भुमिका केली. त्यानंतर विविध नाटक, चित्रपट, लघुपटांचे दिग्दर्शन व अभिनय देखील केला.नाटपरिषदेशी कसे जुळलात?ग्रामीण भागातील कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करणे ही नाट्य परिषदेची भुमिका आहे. त्यामुळे आणपही शाखा स्थापन करावी, असे सुचले. त्यातूनच १९९६ मध्ये नाट्य परिषदेच्या शाखेची स्थापना केली. तेव्हा झालेल्या कार्यक्रमास प्रसिद्ध मराठी चिटपट अभिनेत्री अलका कुबल, मच्छींद्र कांबळी आले होते. तेंव्हापासून आजपर्यंत यामाध्यमातून विविध कार्यक्रम सुरू आहेत. २००९ मध्ये मराठी अभिनेते मोहन जोशी मानोरा येथे आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य महोत्सव झाला. २०१२ मध्ये कलावंत मेळावा घेतला. त्यावेळी अभिनेता रमेश भाटकर आले होते. २०१३ मध्ये शाखेच्या वतीने मालेगाव येथे नाट्य महोत्सव घेतला, त्यावेळीही मोहन जोशी आले होते. २०१४ मध्ये मानोरा येथे विविध कला महोत्सव आयोजित केला होता. त्यासाठी मराठी अभिनेत्री ज्योती मिसळ, चारू देसले यांची उपस्थिती लाभली. आजही रंगभुमी दिन, नाटय, चित्रपट प्रशिक्षण शिबीर आदी उपक्रम राबविले जातात.नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी कुणाचे सहकार्य मिळाले ?ग्रामीण भागातील कलावंताना रंगमंच मिळावा, यासाठी नाट्य परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. मोहन जोशी यांच्या प्रेरणेने व धनंजय रोठे, सज्जनप्रसाद दिक्षीत, सुभाष आरवडेवार, हरिचंद्र पोफळे, सुनील पडघान, माणिक डेरे, राजेंद्रसिंह राजपूत, श्रीभाउ कठाळे, आनंद खुळे, डॉ.पंडित राठोड, प्राचार्य प्रकाश कापुरे यांच्या सहकार्याने नाटयचळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक एकांकीका नाटक यांचे दिग्दर्शन करून भुमिका केली. वर्षभर विविध सांस्कृतिक कायक्रम राबवितो. त्यासाठी माझी पत्नी किरण हिची साथ लाभत आहे.

टॅग्स :interviewमुलाखतwashimवाशिम