शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ग्रामीण भागातील कलावंतांना रंगमंच मिळायला हवा- यशवंत पद्मगीरवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 17:31 IST

नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत देविदास पद्मगीरवार यांच्याशी यासंदर्भात साधलेला साधलेला हा संवाद...

वाशिम: ग्रामीण भागात अनेक अस्सल कलावंत दडलेले आहेत. त्यांना रंगमंच मिळाला तर ते पूर्ण दिमतीने स्वत:ला सिद्ध करू शकतील, त्यांना आपली कला सादर करता येईल. नाट्य परिषदेच्या रुपाने अशा कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या तथा नाट्य चळवळ जीवंत ठेवणाºया व ग्रामीण भागातील कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करून देणाºया नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत देविदास पद्मगीरवार यांच्याशी यासंदर्भात साधलेला साधलेला हा संवाद...आपण नाट्यक्षेत्रात कधीपासून कार्य करित आहात ?- मी १९९२ पासून नाटयक्षेत्रात कार्य करीत आहे. बालपणापासूनच नाटक आवडायचे. गणपती उत्सवात त्यावेळी कलापथक, दंडार, नाटके व्हायची. तेंव्हाच आपणही नाटकात गेले पाहीजे असे मनोमन वाटायला लागले. माझे वडिल साहित्यीक होते. इलेक्ट्रॉनिक रिपेरिअरींगचा व्यवसाय करताना नाटकाला नैपथ्य, प्रकाश देण्याचे काम प्रथम केले. मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील काही ग्रामीण कलावंत नाटक करायचे, तेंव्हा अरविंद साखरकर यांच्या मार्गदर्शनात ह्यअमरज्योती ही बंधुत्वाचीह्ण या नाटकात प्रथम मी भुमिका केली. त्यानंतर विविध नाटक, चित्रपट, लघुपटांचे दिग्दर्शन व अभिनय देखील केला.नाटपरिषदेशी कसे जुळलात?ग्रामीण भागातील कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करणे ही नाट्य परिषदेची भुमिका आहे. त्यामुळे आणपही शाखा स्थापन करावी, असे सुचले. त्यातूनच १९९६ मध्ये नाट्य परिषदेच्या शाखेची स्थापना केली. तेव्हा झालेल्या कार्यक्रमास प्रसिद्ध मराठी चिटपट अभिनेत्री अलका कुबल, मच्छींद्र कांबळी आले होते. तेंव्हापासून आजपर्यंत यामाध्यमातून विविध कार्यक्रम सुरू आहेत. २००९ मध्ये मराठी अभिनेते मोहन जोशी मानोरा येथे आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य महोत्सव झाला. २०१२ मध्ये कलावंत मेळावा घेतला. त्यावेळी अभिनेता रमेश भाटकर आले होते. २०१३ मध्ये शाखेच्या वतीने मालेगाव येथे नाट्य महोत्सव घेतला, त्यावेळीही मोहन जोशी आले होते. २०१४ मध्ये मानोरा येथे विविध कला महोत्सव आयोजित केला होता. त्यासाठी मराठी अभिनेत्री ज्योती मिसळ, चारू देसले यांची उपस्थिती लाभली. आजही रंगभुमी दिन, नाटय, चित्रपट प्रशिक्षण शिबीर आदी उपक्रम राबविले जातात.नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी कुणाचे सहकार्य मिळाले ?ग्रामीण भागातील कलावंताना रंगमंच मिळावा, यासाठी नाट्य परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. मोहन जोशी यांच्या प्रेरणेने व धनंजय रोठे, सज्जनप्रसाद दिक्षीत, सुभाष आरवडेवार, हरिचंद्र पोफळे, सुनील पडघान, माणिक डेरे, राजेंद्रसिंह राजपूत, श्रीभाउ कठाळे, आनंद खुळे, डॉ.पंडित राठोड, प्राचार्य प्रकाश कापुरे यांच्या सहकार्याने नाटयचळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक एकांकीका नाटक यांचे दिग्दर्शन करून भुमिका केली. वर्षभर विविध सांस्कृतिक कायक्रम राबवितो. त्यासाठी माझी पत्नी किरण हिची साथ लाभत आहे.

टॅग्स :interviewमुलाखतwashimवाशिम