शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:48 IST

मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पर्जन्यमान झाले आहे. संततधार अथवा मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत. १३४ पैकी ४६ धरणांमध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन हे चित्र न बदलल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाण्यासाठी हाहा:कार माजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमधील आहे तेवढा पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाशिम जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत तो ६३१.७७ मिलीमिटर असणे अपेक्षित आहे. यावर्षी मात्र त्यात तब्बल १५०.६४ मिलीमिटरने घट झाली असून ४८१.१३ मिलीमिटर एवढाच पाऊस कोसळला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याची टक्केवारी ६०.२४ आहे. दरम्यान, परिणामकारकरित्या घटलेल्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा, काटेपूर्णा, अडाण-मडाण, बेंबळा, स्वासीन यासह उपनद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा एकंदरित १३४ धरणांच्या पातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे ४६ धरणांमध्ये आजही मृत साठा शिल्लक असून ५० ते ७५ टक्के भरलेल्या धरणांची संख्या केवळ ६ आहे. या विदारक स्थितीमुळे आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरत आहे.

रब्बी हंगामात जाणवणार सिंचनाचा प्रश्नवार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल््याच्या पर्जन्यमानात सद्य:स्थितीत ४० टक्क्यांची तूट आहे. सप्टेंबर या पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसांत ती भरून निघणे अशक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ही बाब प्रत्यक्षात खरी झाल्यास आहे ते पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यामुळे रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत वर्तविण्यात ेयत आहेत.

मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्येजिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका यंदा ‘डेंजर झोन’मध्ये असून या तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस केवळ १० टक्के जलसाठा आहे. यापाठोपाठ रिसोड १४, मालेगाव १५, मानोरा १६, कारंजा १९ आणि वाशिम तालुक्यातील धरणांमध्ये ३५ टक्के जलसाठा झाला आहे.

समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातून वाहणाºया नद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. धरणांच्या पातळीतही वाढ झालेली नाही. आगामी काही दिवसात मोठा पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमध्ये आहे तेवढे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसriverनदीDamधरण