शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:48 IST

मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पर्जन्यमान झाले आहे. संततधार अथवा मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत. १३४ पैकी ४६ धरणांमध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन हे चित्र न बदलल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाण्यासाठी हाहा:कार माजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमधील आहे तेवढा पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाशिम जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत तो ६३१.७७ मिलीमिटर असणे अपेक्षित आहे. यावर्षी मात्र त्यात तब्बल १५०.६४ मिलीमिटरने घट झाली असून ४८१.१३ मिलीमिटर एवढाच पाऊस कोसळला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याची टक्केवारी ६०.२४ आहे. दरम्यान, परिणामकारकरित्या घटलेल्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा, काटेपूर्णा, अडाण-मडाण, बेंबळा, स्वासीन यासह उपनद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा एकंदरित १३४ धरणांच्या पातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे ४६ धरणांमध्ये आजही मृत साठा शिल्लक असून ५० ते ७५ टक्के भरलेल्या धरणांची संख्या केवळ ६ आहे. या विदारक स्थितीमुळे आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरत आहे.

रब्बी हंगामात जाणवणार सिंचनाचा प्रश्नवार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल््याच्या पर्जन्यमानात सद्य:स्थितीत ४० टक्क्यांची तूट आहे. सप्टेंबर या पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसांत ती भरून निघणे अशक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ही बाब प्रत्यक्षात खरी झाल्यास आहे ते पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यामुळे रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत वर्तविण्यात ेयत आहेत.

मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्येजिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका यंदा ‘डेंजर झोन’मध्ये असून या तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस केवळ १० टक्के जलसाठा आहे. यापाठोपाठ रिसोड १४, मालेगाव १५, मानोरा १६, कारंजा १९ आणि वाशिम तालुक्यातील धरणांमध्ये ३५ टक्के जलसाठा झाला आहे.

समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातून वाहणाºया नद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. धरणांच्या पातळीतही वाढ झालेली नाही. आगामी काही दिवसात मोठा पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमध्ये आहे तेवढे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसriverनदीDamधरण