शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:48 IST

मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पर्जन्यमान झाले आहे. संततधार अथवा मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत. १३४ पैकी ४६ धरणांमध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन हे चित्र न बदलल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाण्यासाठी हाहा:कार माजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमधील आहे तेवढा पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाशिम जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत तो ६३१.७७ मिलीमिटर असणे अपेक्षित आहे. यावर्षी मात्र त्यात तब्बल १५०.६४ मिलीमिटरने घट झाली असून ४८१.१३ मिलीमिटर एवढाच पाऊस कोसळला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याची टक्केवारी ६०.२४ आहे. दरम्यान, परिणामकारकरित्या घटलेल्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा, काटेपूर्णा, अडाण-मडाण, बेंबळा, स्वासीन यासह उपनद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा एकंदरित १३४ धरणांच्या पातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे ४६ धरणांमध्ये आजही मृत साठा शिल्लक असून ५० ते ७५ टक्के भरलेल्या धरणांची संख्या केवळ ६ आहे. या विदारक स्थितीमुळे आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरत आहे.

रब्बी हंगामात जाणवणार सिंचनाचा प्रश्नवार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल््याच्या पर्जन्यमानात सद्य:स्थितीत ४० टक्क्यांची तूट आहे. सप्टेंबर या पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसांत ती भरून निघणे अशक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ही बाब प्रत्यक्षात खरी झाल्यास आहे ते पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यामुळे रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत वर्तविण्यात ेयत आहेत.

मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्येजिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका यंदा ‘डेंजर झोन’मध्ये असून या तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस केवळ १० टक्के जलसाठा आहे. यापाठोपाठ रिसोड १४, मालेगाव १५, मानोरा १६, कारंजा १९ आणि वाशिम तालुक्यातील धरणांमध्ये ३५ टक्के जलसाठा झाला आहे.

समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातून वाहणाºया नद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. धरणांच्या पातळीतही वाढ झालेली नाही. आगामी काही दिवसात मोठा पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमध्ये आहे तेवढे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसriverनदीDamधरण