शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या कोरोना संसर्गामुळे एसटी प्रवासाकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड असे हे ...

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड असे हे चार आगार आहेत. या चार आगारांतून पुणे, औरंगाबाद, नागपूर ते मुंबई या महानगराकडे दरदिवशी हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. कोरोना संसर्गकाळात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली होती, तर लॉकडाऊन काढल्यानंतरही जवळपास दोन महिने एसटीच्या प्रवासीसंख्येला प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळ डबघाईस आले होते. त्यानंतर मात्र एसटीच्या प्रवासी वाहतुकीला मोठा प्रतिसाद लाभू लागला. जिल्ह्यात ७ हजारांहून अधिक प्रवासी दरदिवशी एसटीने प्रवास करू लागले. आता मात्र कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात वाशिम जिल्ह्यात गेल्या दोनच दिवसांत प्रवाशांच्या संख्येत जवळपास ४० टक्के घट झाल्याने आगारप्रमुखांना काही फेऱ्या रद्दही कराव्या लागल्या आहेत.

----------------

औरंगाबाद मार्गावर प्रवासीसंख्येत मोठी घट

* वाशिम जिल्ह्यातील चारही आगारांतून नागपूर, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई आदी महानगरांत मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात.

* कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जवळपासच्या जिल्ह्यांत एसटी प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला असतानाच औरंगाबाद, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याचे चित्र आहे. महानगरातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याने या महानगरांत जाण्यास जिल्ह्यातील लोक मागेपुढे पाहत आहेत.

----------------

८ मार्गावर एसटी बंद

* जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गावर एसटीच्या बसफेऱ्या धावत असल्या तरी ग्रामीण भागांतील ८ मार्गावर एसटीच्या बसफेऱ्या बंद आहेत.

* * * * * * *जिल्ह्यातील आगारात बसगाड्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध गाड्यांतून नियोजन केले जात असल्याने कमी प्रवासी असलेल्या ८ ग्रामीण मार्गावरील बसफेऱ्या बंद आहेत.

---------------

ना मास्क, ना डिस्टन्सिंग

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तथापि, एसटीचे काही वाहक, चालक आणि अनेक प्रवासी मास्क वापरत नसून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नसल्याचे चित्र बसस्थानक आणि एसटीत दिसत आहे.

------------

जिल्ह्यातून एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या

३२०००

लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या

५०००

एसटी सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या

२००००